Ads 468x60px

Monday, September 24, 2012

मधुघोट (कविता)


जीवापाड प्रिती वेडया करिशी मजवर,
राहवेना तुझ मजवीण क्षणभर,
प्राशूनिया मज बेधुंद झिंगशी,
परि मी न बेवडा जगास सांगशी. 

हिरावूनी सानुल्याच्या मुखीचा घास,
अन् गमावून सखीचा विश्वास.
काय हा मजशी एकरूप होण्याचा वेडा ध्यास,
दुःख विसरे पेल्यात हा तर एक आभास.

अनंत माझ्या जाती अन् राशी,
परि इमान राखला पिढीजात गुणांशी.
जाती-धर्मांनी बाटवले माणसांशी,
बुडविला हा विटाळ मी एका पेल्याशी.

जगी निर्मळ मजसम कोण?
झोपवण्या मज झटती सज्जन.
नर जोवरी भूवर मी न कुणा शरण,
वेश्येस ना वैधव्य ना मज मरण.

मीच विनवते तळीरामा सोड मज या क्षणा,
नको करू वेड्या आपल्यांशीच प्रतारणा.
मरणानंतरही होईल रे तुझी दैना,
तुजसाठी येतील अश्रू कोणाच्या नयनां ?.

       ---संतोष गांजुरे

Wednesday, September 19, 2012

राजाची कर्जमाफी


                  सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी का देते हेच कळत नाही?

बरं दिली तर दिली ती पोहचली का त्यांच्यापर्यंत का मध्येच पाय फुटले तिला. जाऊ द्या हो आपले कार्यकर्ते तर गब्बर झाले ना! शेतकऱ्यांच्या आत्महत्तेशी आपले काय घेणे देणे!

   खरतर कर्जमाफिची काही एक गरज नाहिये,आपला शेतकरी कष्टाळू आहे भिकारी नव्हे!

त्यांना फ़क्त योग्य वीज,पाणी, बाजारपेठ द्या, कर्जमाफीच्या कुबडयांची त्यांना काही एक गरज नाहिये !!!




संतोष गांजुरे--                

भूकमोड


मला खूपच भूक लागलीये, काहीतरी तजवीज करायलाच हवी.
भुकेने व्याकूळ असलो तरी काहीच सोय नाही अशातला भाग नाही
.

 पण खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशीचा हेका अजून कायम आहे .
या नसत्या दळभद्री शाही थाटासाठी,
खूप मेहनतीची जोड हवी आहे.
पण असेल हरी तर देईल खाटल्यावरीची मग्रुरी अजून शाबूत आहे
.
पराक्रमाला आळसाचे कोंदण आहे,
रोज मनी दिवास्वप्न पाहणे आहे.
काही विशेष नाही मित्रांनो पण
...
भूकमोड तर होणार नाही ना?
या चिंतेने आता झोपमोड झालीये!!! 


 ****************************************************************

फार वर्षापूर्वी एका मराठी मालिकेच्या एका भागात लाईटर दहा वेळा पेटवण्याची पैज लागलेली असते, ज्याचा लाईटर असतो त्याला पूर्ण खात्री असते की तो लाईटर दहाच काय शंभर वेळा पेटवू शकेन, पण पैज खूप मोठी असल्याने खात्री पटविण्यासाठी आधीच तो लाईटर अनेक वेळा पेटवतो ... आणि ऐन पैईजेच्यावेळी दहाव्यांदा तो पेटतच नाही!!!!!!!!!!!!आता मला अगदी तशीच भिती वाटू लागली आहे !!!!!!!!!

                          ---संतोष गांजुरे


मी आणि माझी अहंकारीक वचने -- 3


खुप कष्ट करुन देखिल तुम्हाला पैसा मिळत नसेल तर काळ्जी करु नका, उलट खुश व्हा कारण भविष्यकाळात अमाप मिळणार्‍या पैशासाटी तुमची झोळी मजबूत करण्याचे काम चालु आहे याची खात्री बाळगा...
******************************************************
माझ्याकडुन असंख्य गुन्हे घडले तरी चालतील नव्हे ते घडावेत अशी माझीच इच्छा आहे.कारण आज मी जे गुन्हे करणार आहेत ते ऊद्या आदर्श ठरल्याशिवाय राहणार नाहित याची मला पुर्ण खात्री आहे.
 ******************************************************
आतापर्यंत बाई आणि बाटलीच्या जोरावर अनेकांनी आपआपली साम्राज्ये उभी केली आहेत मीही तेच करणार आहे, फरक एवढाच की मी ते बाईला उभी आणि बाटलीला आडवी करून करणार आहे!!!!!
 ******************************************************
मी खुप वाईट आहे हे मला माहीत आहे पण जे स्वत:ला चांगले समजतात त्यांच्या इतका नक्कीच नाही, हे ही मला माहित आहे.
******************************************************
मला ज्या गोष्टींचा राग येतो त्या मी इतराबरोबर कधीही करत नाही आणि कोणी केलेल्या ही मला आवडत नाही.
 ******************************************************
 आज ज्या गोष्टींचा आपल्याला अभिमान वाटतो कदाचित त्याच गोष्टींची उद्या लाज वाटू शकेल.
 ******************************************************
मुलींना पुरुषांच्या नजरेत काय आहे ते लगेच ओळखता येते तर मग इतक्या मुलींचा बळी का जातो हेच समजत नाही!
 ******************************************************
कोणतीही गोष्ट अनपेक्षितपणे घडत नसते.
एखाद्याला जेव्हा खुप मोठे यश मिळते,तेव्हा सर्वजण त्याला हे अनपेक्षित भेटले असे समजतात! पण ते यश समाजासाठी अनपेक्षित असते त्या व्यक्तिसाठी नव्हे!
ते यश मिळवण्यासाठी त्याने खुप कष्ट केलेले असतात,खुप काही गमावलेलेही असते.खुप अवहेलना सहन केलेली असते.
आपण मात्र सोइस्कररित्या नेमक्या त्याच गोष्टी विसरतो!
******************************************************
जग बदलवणे काहीच अवघड नाहिये...
...
पण प्रथम स्वत:ला बदलायला हवे!!!!
******************************************************
ज्या पैशांमुळे काल पर्यंत मला किमंत नव्हती आज मी त्या पैशाला काडीचीही किमंत देत नाही.
 ******************************************************
आकाशी झेप घेणे अवघड नाही.....
....
पण टिकून रहाणे तोपर्यंतच शक्य आहे जोपर्यंत तुमचे पाय जमिनीवर आहेत!!!!
******************************************************
पैशाशिवाय शहाणपण नाही हे खरे आहे पण...
शहाणपणाशिवाय तरी पैसा कसा मिळणार !!!
आधी शहाणपणा अंगी बाणवा नंतर शान आणि शहाणपणा दाखावण्यासठी पैसा कमवा !!!!
 ******************************************************
माझी श्रीमंती मी पैश्यापेक्षा माझ्या सोबत असलेल्या मित्र जवळच्या माणसांवरूनच मोजण्याचा
प्रयत्न केला.पण सर्वांनाच प्रेमाणे जोड़ता येते असे नाही,काहीना पैसा status ही हवे असते!
पैसा हाच माणसे जोडण्याचा short-cut आहे,हे माझ्या कधी लक्षात आले नाही!!!
..पण जे माझ्यासोबत आहेत ते मला कधीही सोडून जाणारे आहेत याचा मला अभिमान अणि पूर्ण विश्वास आहे.
...कारण पैसा हा टिकाऊ नाहिये आणि त्याने जोडलेली माणसेही!!!!!!!!!!
******************************************************


 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!