Ads 468x60px

Monday, September 9, 2013

बलात्कार ख्ररेच थांबावेत ?????

    दररोज बलात्काराच्या बातम्या आणि त्या संदर्भातील प्रतिक्रिया ऐकून आम्ही व्यथित होत होतो. परंतू आमची व्यथा कशी व्यक्त करावी या विवंचनेत कित्येक दिवस आम्ही अस्वस्थ होतो. कारण आम्हीसुध्दा काही धुतलेल्या तांदळासारखे नाही आहोत. आमच्याकडूनही काही वेळा मानसिक व्यभिचार होतो त्यामुळे या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे की नाही हा प्रश्न पडला होता. खूप विचारांती आम्ही या निष्कर्षाप्रत आलो कीआमचा हा मानसिक व्याभिचार म्हणजे कधी अप्रतिम सौंदर्याला दिलेली दाद होती, तर कधी पुरुषत्वाने घातलेली साद होती. आणि या सर्व गोष्टी मनातल्या मनात होत्या त्याचा त्रास कोणाला ही झाला नाही, म्हणजे याबाबत वाद असण्याचे काही कारण नाही. दुसरे असे की मानसिक व्याभिचार न केलेली व्यक्ती या पृथ्वीतलावर सापडणे केवळ अशक्य. आमच्या कित्येक मित्रांनी प्रेमविवाह केला आहे, पण तरीसुध्दा त्यांची वासुगिरी,लाळ घोटेपणाला काही मर्यादा नाही याच गोष्टीवरुन कित्येकदा आमचे वाद झाले आहेत. त्यामुळे त्यामानाने निश्चितच आम्ही कितीतरी सज्जन आहोत. असो तर विषयाला सुरूवात करूया....
      राजधानीतील अमानुष सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर अशा प्रकरणांचे पीकच आले आहे असे वाट्तेय.त्याबरोबरच वाटेल त्या विक्षिप्त प्रतिक्रिया देण्याचेही पीक भलतेच फोफावले आहे. आमच्या दृष्टिकोनातून बलात्कार ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. कोणी ठरवून किवा कट रचून करत असतील असे मला वाटत नाही, पण काही वेळेस बदला घेण्याचा किवा इतरही काही उद्देशाने ठरवून किवा कट रचून करत असतील याचीही शक्यता नाकारता येत नाही. कोणी पीड़ित मुलीलाच जबाबदार धरत आहेत कोणी समाजव्यवस्थेला. कोणी क़ायदा बदलण्याची भाषा करतोय तर कोणी आरोपीला काय शिक्षा द्यायची याची भाषा करतोय. मीडीयावालेही या वाहयात प्रतिक्रियांना भलतीच प्रसिद्धि आणी मह्त्व देत आहे व आपण ही चवीने त्या बातम्या वाहिन्याना हवाहवा असलेला टी. आर. पी वाढण्यास मदतच करत आहोत.
      बलात्कार हा आपल्या मानवजातीवरील सर्वात घाणेरडा कलंक आहे व तो दूर करणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे हे जाणून ह्या संकटामधून सर्वांच्या सहभागतून एखादा सुवर्णमध्य काढायचा सोडून एकमेकांना वाहयात सल्ले देण्याची चढाओढच लागली आहे. उदाहरणादाखल..
      पीडिताने जर बलात्काराचा आनंद लुटला असेल तर, अशा गुन्ह्यासाठी देहदंडाविषयी शिक्षा देताना दोनदा विचार करावा- एक न्यायाधीश
      आरोपींबरोबरच पीडित तरुणीसुद्धा तेवढीच जबाबदार."टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही हातांनी वाजते", तिने आरोपींना भाऊ, दादा संबोधून आपला जीव व इज्जत वाचवायला हवी होती"-स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु.
"बलात्काराच्या घटना घडायला नको असतील तर बालविवाह केले जायला हवेत" - माजी मुख्यमंत्री
      क्षुल्लक प्रसिध्दीपोटी टिचभर कपडे घालून उत्तान दृश्‍ये, अश्लील अंगविक्षेप करणार्‍या मॉडेल्सनी बलात्कराला आम्ही जबाबदार नाही,ते तर आमच्या जन्माच्या आधीही व्हायचे. बलात्कार्यांना फाशी द्यावी, त्यांचे लिंग कापून टाकावे अशा प्रकारची वक्तव्य केली.त्यांच्या प्रतिक्रिया देण्यात पिडितेबद्दलच्या आत्मियतेपेक्षा प्रसिध्दीची हाव जास्त होती.
      काय कारणे असू शकतील बलात्काराला निव्वळ विकृती,पुरुषी अहंकार,स्त्रीयांबद्दलची तुच्छता,पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव, फॅशनेबल,आखूड कपडे, भडक मेकअप, लिंगगुणोत्तरातील तफावत,सार्वजनिक ठिकाणी चाललेले अश्लील चाळे, आर्थिक,सामाजिक परिस्थितीमुळेचा अविवाहितपणा, मागणी तसा पुरवठा नाही झाला तर बंड हे होणारच. ही सगळीच कारणे गृहीतधरून काही गोष्टीवर आपण स्वत:च निर्बंध घातले तर एक जबाबदार समाज म्हणून या पापातून थोडी का होईना मुक्ती होईल.
      आखूड आणि तंग कपडे घालणे ही फक्त फॅशनच नाही तर मॉडर्नपणा दाखविण्याची गरज अर्थात स्टेटस सिम्बॉल बनले आहे. बराचसा वादही यावरूनच आहे, ही एक अशी गोष्ट आहे त्यामुळे मुले बलात्कारास प्रवृत्त होतात असा खूप जणांचा आक्षेप आहे, पण ह्या नराधामांच्या वासनेस ६ महिन्याच्या मुलीपासून ६० वर्षाच्या वृद्धेपर्यंत कोणीही बळी पडत असते. कमीत कमी १३ वर्षापर्यंतच्या मुलीकडे पाहून बलात्कारास प्रवृत्त होणे ही विकृती नाही का? त्या ६ महिन्याच्या, ६ वर्षाच्या मुलीने काय गुन्हा केलाय तिने काय तंग कपडे घातले होते, का तिने त्याला दादा म्हणायला पाहिजे होते म्हणजे त्याने तिला सोडून दिले असते? एवढ्या लहान मुलीकडे पाहून जर कोणी उत्तेजित होत असेल तर त्याने तात्काळ मानसोपचार तज्ञांची भेट घेऊन पुढे होणारा अनर्थ टाळावा हे उत्तम.मुलींनीही समाजात वावरताना जबाबदारीने वागलेले उत्तम, तुमचे आखूड कपडे, भडक मेकअप, तथाकथित बॉयफ्रेंड बरोबरचे चाळे करून सुध्दा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या सुरक्षितपणामुळे तुम्ही बलात्कारास बळी पडत नसाल पण तुम्हाला पाहून एखादा पेटलेला नराधम एखाद्या लहान,असहाय मुलीवर बलात्कार करायला प्रवृत्त होत नसेल कशावरून? निश्‍चितच प्रत्येकाने सुंदर दिसण्याचा प्रयत्‍न करणे यात काहीच गैर नाही, चारचौघात आपण उठून दिसत असू तर आपला आत्मविश्वास आपोआपच द्विगुणित होतो यात शंका नाही पण मेकअप करताना तो सौंदर्य खुलविण्यासाठी करतोय खुणविण्यासाठी नाही हे लक्षात ठेवावे.
      बलात्कार करून खून, सामूहिक बलात्कार अशा प्रकरणात द्रुतगती न्यायालये स्थापन करावीत एक ते तीन महिन्यात अंतिम निकाल द्यावा. गुन्हा सिध्द झाल्यास अशा गुन्हेगारांस शक्यतो फाशीची शिक्षा तीही तात्काळ देण्यात यावी. पण जिथे एकाच व्यक्ती कडून बलात्कार केला जातो तिथे मात्र असे करणे उचित होणार नाही, त्या प्रकरणात काही वेगळे पैलू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीसुध्दा व्यवस्थित गुन्हा शाबित झाला तर त्याला जन्मठेप देण्यात यावी. इतर गुन्ह्यात शिक्षा देताना गुन्हेगार एकापेक्षा जास्त असतील तर त्यांच्या शिक्षेत भागाकार होत असेल पण सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात शिक्षा देताना गुणाकार करावा.
      ज्या घरात स्रीयांचा आदर सत्कार होत नसेल त्या घरात सुख-समाधान कधीच लाभू शकणार नाही, एक लक्षात ठेवा तुमची बायको,आई,बहीण खुष असेल तरच तुम्ही खुष राहू शकाल पण त्यांचा छळ करूनही तुम्ही सुखी राहू शकत असाल तर मग आपण माणूस म्हणवून घ्यायच्या लायकीचे नाही आहोत हे लक्षात ठेवा. मुलगा-मुलगी भेद करू नका, मुलीच्या जन्माचीही तेवढ्याच आतुरतेने वाट पहा. शेवटी ती आहे म्हणून तो आहे आणि तो आहे म्हणून ती दोघेही एकमेकाशिवाय अपूर्णच मग भेदभाव कशाला. चला मानसिकता बदलूया, देश बदलूया एक नवीन सुसंस्कृत भारत घडवूया..

               --संतोष गांजुरे.

माझ्या मनीचा राजकुमार !!!

   माझ्या इतकी सुंदर तरुणी मी अद्याप पाहिलेली नाही, तरी त्यावेळेसची गोष्ट काही औरच होती पहिल्यांदा नव्या ऑफीसमध्ये पाऊल टाकताच सर्वांच्या नजरा माझ्यावरच खिळल्या आहेत याची मला जाणीव झाली, अर्थात ही बाब माझ्यासाठी काही नवीन नव्हती. शाळा,कॉलेज,कॉलनीच कुठेही असू दे असाच अनुभव. काही वेळा ते आवडायचे सुध्दा पण बर्‍याचदा त्या विखारी, वासनांध नजरा पाठी टोचत राहायच्या. माझ्या येण्याने सर्वांना जो अवर्णनीय आनंद झाला होता तो लपता लपत नव्हता.
                यथावकाश तास-दोन तासांत वातावरण पूर्ववत झाले, आम्हां सर्वांचे दुपारचे जेवण झाल्यावर पुन्हा कामास सुरूवात केली. सर्व आपआपल्या कामात मग्न होते ते नाइलाजानेच म्हणा. तेवढ्यात एक जण आत आला तो आल्याबरोबर सर्व वातावरणच बदलून गेले सकाळी मी आले त्यावेळी ते ठीक होते पण एक नेहमीचा येणारा तरुण त्याला पाहून सर्वानी एवढे खुष व्हावे याचे मला आश्यर्य वाटले, त्याही पेक्षा जास्त आश्चर्य त्याने सर्वांशी हाय-हॅलो केले पण माझ्याकडे एक साधा कटाक्षही नाही टाकल्यामुळे झाले हे मला अपेक्षितही नव्हते अन् मान्यही नव्हते.  एखाद्या तरुणाने माझ्याकडे दुर्लक्ष करावे ही बाब मला खटकलीच.
                असेच दोन-तीन दिवस गेले पण आमच्या दोघात काही बोलणे झालेच नाही, एका दिवशी रिपोर्ट्स तयार करताना मला त्यात मला काही अडचण आली म्हणून त्याला ती विचारली. तो कसा प्रतिसाद देतोय याची थोडी भिती वाटली पण नाईलाज होता त्यावेळी दुसरे कोणीच जवळ नव्हते. पण माझा अंदाज चुकला, त्याने त्याचे हातातील काम बाजूला ठेवले व मंदस्मित करत, नजरेला नजर भिडवत समजावुन सांगू लागला. माझ्या तर काळजाचा ठोका चुकला. त्याच्या डोळ्यात,बोलण्यात काही तरी जादू नक्की होती. आता मला त्याचे वेगळेपण जाणवू लागले.प्रत्येक मुलगा स्वत:ला डॅशिंग,डायनामिक,हॅंडसम समजत असतो पण त्याला पाहून खरोखर मला तो तसा आहे असे वाटले. त्याचे एका शब्दात वर्णन करायचे तर राजबिंडा असेच करता येईल. त्याचा आचार-विचारच नव्हे तर इतरांकडून होणारा त्याचा प्रचार सुध्दा त्याचे राजेशाहीपण अधोरेखित करत होते ते उगीच नाही.
                आता मात्र तो माझ्याशी दिलखुलास बोलू लागला. मलाही त्याच्याशी बोलणे आवडू लागले. आतापर्यंत प्रत्येक जण माझ्याशी बोलण्याचा,हाय-हॅलो करण्याचा प्रयत्‍न करत पण पहिल्यांदाच मला दुसर्‍या कोणाशी स्वत:हून बोलावासे वाटत होते, तो आल्याबरोबर  आता माझ्या चेहऱ्यावर स्मित उमटू लागले. प्रत्येक दिवशी आमची जवळीक वाढत होती. आणि न राहवून एकेदिवशी मी तो आल्यावर शेकहॅण्ड केले अर्थात ही गोष्ट कोणाच्याच नजरेतून सुटली नव्हती. पुरुषाच्या स्पर्शात काय जादू असु शकते याचा पहिल्यांदाच मी अनुभव घेत होते. क्षणात माझ्या सर्वांगावर सरसरुन रोमांच उभे राहीले.त्याच्या हातात माझा दिल्यावर किती आश्वस्त वाटत होते. आजपर्यंत कित्येकांनी माझ्याशी सहेतुक शेकहॅण्ड वा स्पर्श केला होता पण असे कधीच झाले नव्हते उलट काही वेळा झुरळ अंगावर पडल्यावर जशी शिसारी येते तशी माझी अवस्था व्हायची.
                दिवसेंदिवस मी त्याच्याकडे आकर्षित होतेय याची त्याला जाणीव नसेल अशी शक्यता नव्हती. पण एका मर्यादेबाहेर जाण्याचा वाहयातपणा त्याने कधी केला नाही. त्याने मला प्रपोज केले असते तर मी होकार दिलाच असता असे नाही, पण त्याने मला प्रपोज करावे असे नेहमी वाटायचे. त्याच्या मिठीत बेधुंद विसावावे असे वाटायचे. मनी वसे ते स्वप्‍नी दिसे या उक्तीप्रमाणे सतत त्याचा विचार केल्यामुळे तो नेहमी माझ्या स्वप्नात यायचा, पण स्वप्नातसुध्दा त्याने मर्यादा सोडली नाही मी मात्र बेशलाक त्याचा मिठीत बेधुंद विसावयाची. पण प्रत्यक्षात हा योग कधीच जुळून नाही आला. 
                आज मी दोन मुलांची आई आहे आणि आजही तो माझ्या मनात आहे, कधी तो माझ्या स्वप्नातही येतो पण तो अजूनही तसाच आहे पण मला मात्र का कोणास ठाऊक माझी दोन्ही मुले हुबेहुब अगदी त्याच्यासारखीच आहेत असे नेहमी वाटत राहते.
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!