Ads 468x60px

Thursday, October 2, 2025

 आरक्षणाचे खरे मारेकरी - फुले, शाहू, आंबेडकर

                    हजारो वर्षे वर्णव्यवस्थेच्या पिंजऱ्यात बंदिस्त केलेल्या हिंदू समाजाला शिक्षणाचा अधिकारच नव्हता. शिक्षणाचा अधिकार फक्त एकाच भारतात आक्रमण करून(आगमन नव्हे) स्थलांतरीत समाजाला, त्यांना शिक्षणाचे पूर्ण आरक्षण. तुरळक अपवाद म्हणून त्या भटक्या आक्रमक समाजाव्यतिरिक्त काहीजण शिकले असतील पण म्हणून अपवादांचे सामान्यीकरण करता येणार नाही. समकालीन सर्वसाधारण शैक्षणिक परिस्थिती काय होती हे महत्त्वाचे. स्वतःपुरते मर्यादित असलेल्या शिक्षणामुळे आपसूकच शारीरिक श्रम अन् कौशल्य वगळता सर्वच क्षेत्रात एकाच समाजाची मक्तेदारी. इथले भूमिपुत्र असलेले सर्व हिंदू शूद्रातिशुद्र, एवढेच काय त्या अघोषित आरक्षित समाजातील महिला देखील शूद्रच. या मूठभर असलेल्या परप्रांतीय समूहाने हजारोंवर्षे येथील हिंदू समाजावर वर्चस्व गाजवले. या भटक्या समूहाने हिंदू धर्म हायजॅक करत हजारो वर्षे आणि शेकडो पिढ्यांपासून हिंदू समाजाला गुलामगिरीत बंदिस्त केले. या समाजानंतर सुद्धा अनेक आक्रमक आले पण काही वर्षात ते परतले तर काही येथेच राहून येथील समाजाचाच एक भाग बनले. शक्यतो जेव्हा एखादा व्यक्ती, समूह दोनतीन पिढ्यानंतर जिथे स्थलांतरित झाला आहे त्या समाजाचा, संस्कृतीचा भाग बनून त्यांच्या मिळून मिसळून जातो. पण हा आक्रमक, भटका समूह हजारों वर्षांपासून भारतीय समाजाचा भाग बनू शकला नाही. ज्यावेळी दुसरे त्यांच्या वरचढ आक्रमक आले तेव्हा त्यांनी त्यांच्याशी सूत जुळवून घेतले, त्यांच्यासाठी खर्डेघाशी केली, हेरगिरी केली आणि येथील स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लढवय्या भूमिपुत्रांच्या खबरी तत्कालीन शासनकर्त्यांना देऊन आपला स्वार्थ साधून घेतला. कावेबाजपणा अन् भेदाभेद हेच त्यांच्या टिकून राहण्याचे जालीम हत्यार राहिले आहे. 

                     मूठभर असलेल्या भटक्या स्थलांतरीत लोकांनी एवढ्या मोठ्या प्रदेशावर, लोकांवर वर्णव्यवस्थेचे जोखड लादून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आपला कावेबाजपणा उघड झाला तर आपले अस्तित्व धोक्यात येईल याची जाणीव त्यांना होती म्हणून त्यांनी वर्णव्यवस्थेची उतरंड अशाप्रकारे निर्माण केली की, त्या उतरंडीमध्ये स्वतःला शिरोभागी ठेवत, सर्वाधिकार आपल्याकडे ठेऊन उतरंडीनुसार कमीतकमी अधिकार देऊन स्वतःचे वर्चस्व चिरंतन राहण्यासाठी वर्णव्यवस्था ही परिसंस्था (इकोसिस्टिम) निर्माण केली. या उतरंडीच्या खालच्या पायरीवर असलेल्यांना वरच्या पायरीवर असलेल्यांच्या मेहरबानीवर जगावे लागत होते. थोडक्यात खालच्या पायरीवर असलेला वरच्या पायरीवर असलेल्याचा सेवेकरी आणि अर्थातच सर्वात शिरोभागी असलेला केवळ मेवेकरी. त्यामुळे तळात असलेल्या समाजाचे जगणं प्रचंड खडतर आणि हलाखीचे होते. या विषमतावादी वर्णव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक समूह वर्णव्यवस्थेचा कमी अधिक प्रमाणात पिडित असला तरी, वर्णव्यवस्थेच्या पिंजऱ्यात अशाप्रकारे अडकला की त्याला आपल्यापेक्षा कोणीतरी खालच्या पायरीवर आहे आणि आपण केवळ वरच्या पायरीवर असलेल्या समाजात जन्माला आलो आहोत म्हणून आपले काही कर्तृत्व नसताना खालच्या पायरीवर असलेल्यांवर वर्चस्व गाजवू शकतो या भावनेनेच सुखावतो. पण त्याच्या हे लक्षात येत नाही की सगळ्यात शिरोभागी असलेल्या भटक्या, परक्या समूहाला सर्वाधिकार आहे आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांना इतरांसारखी शिक्षा नाही. ते कितीही नितीभ्रष्ट झाले तरी सर्वश्रेष्ठच राहतील. ते स्वतःला केवळ हिंदूच समाजच नव्हे तर हिंदूच्या देवदेवतांच्यापेक्षाही श्रेष्ठ समजतात पण हे शिक्षणाअभावी त्यांच्या कधीच लक्षात आले नाही आणि हिंदू नसलेल्या उपऱ्या समाजाला हिंदूंचे तारणहार समजून त्यांचे वर्चस्व आणि हिंदू धर्माच्या व्यवस्थेचा भाग नसलेल्या उपऱ्या वर्णव्यवस्थेचे जोखड हिंदूसमाज हजारों वर्षापासून आनंदाने वाहत आहे आणि म्हणूनच आजसुद्धा आपली योग्यता आपली जात ठरवते आणि त्यानुसार आपल्याशी व्यवहार केला जातो. 

                  जगभरात धर्मसत्ता राजसत्तेवर पर्यायाने सामान्य जनतेवर वर्चस्व गाजवत असताना भारतात छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मसत्तेचे वर्चस्व, अन्याय्य रूढी-परंपरा मोडीत काढत रयतेचे स्वराज्य निर्माण केले. तत्कालीन धर्ममार्तंडानी शिवाजी महाराजांना 'शूद्र' म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला कारण वर्णव्यवस्थेनुसार, शूद्रांना राज्याभिषेक (राज्यारोहण) करण्याचा अधिकार नव्हता. शिवाजी महाराज आधीच रयतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान होते त्यांनी राज्याभिषेक नसता केला तरी त्यांच्या कर्तृत्वात उणेपणा आला नसता पण त्यांच्या समकालीन इतर शासकांच्या दृष्टीने स्वराज्याला स्वतंत्र, सार्वभौम राज्य आणि परकीय शासकांशी व्यापार आणि लष्करी करार करण्यासाठी शिवाजी महाराजांना 'छत्रपती' म्हणून मान्यता मिळवण्यासाठी राज्याभिषेक गरजेचा होता आणि तो त्यांनी स्थानिक धर्ममार्तंडांचा विरोध झुगारून आपल्या गनिमी काव्याने करवून घेतला. याशिवाय शूद्रांना शस्त्र धारण करण्यास मनाई होती, शिवरायांनी हे नियम मोडत अठरापगड जातींना आपल्या लष्करता सामावून घेतले. धर्ममार्तंडानी केवळ अधिकारासाठीच नव्हे तर गुन्ह्यातील शिक्षेत सूट मिळावी म्हणून स्वतः साठी जन्मजात विशेषाअधिकारांची तजवीज केली होती. धर्ममार्तंड स्वतःला भुदेव समजत होते व त्यांची हत्या म्हणजे मोठे पातक समजले जात होते. महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण करताना स्वराज्याच्या हिताआड येणाऱ्या धर्ममार्तंडांचे लाड न करता फितूर झालेल्यांची गर्दन मारताना बिल्कुल मुलाहिजा राखला नाही. थोडक्यात शिवरायांनी जन्मजात विशेषाधिकराचे जे अघोषित आरक्षण होते त्याचा कडेलोट केला. शिवरायांच्या या धोरणांमुळे जन्मजात वर्णव्यवस्थेची बंधने तोडता येतात याचा विश्वास समाजामध्ये निर्माण झाला. साम्राज्ये अनेकांनी उभारली पण एखाद्या प्रगल्भ लोकशाहीला हेवा वाटेल असे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारले. लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरावी, लोककल्याणाचे, रयतेचे राज्य कसे असावे याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला. हा वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे चालवताना स्वराज्यद्रोही तथाकथित भूदेवांना हत्तीच्या पायाखाली दिले.  

              शिक्षणाअभावी गुलामीत जगणाऱ्या देशातील हिंदूंच्या दुरावस्थेचे निदान महात्मा जोतीराव फुले यांनी एकाच कडव्यात प्रभावीपणे केले आहे. 

                    विद्येविना मती गेली। 

                    मतिविना नीती गेली। 

                    नीतिविना गती गेली। 

                    गतिविना वित्त गेले। 

                    वित्ताविना शूद्र खचले। 

             इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

महात्मा ज्योतिराव फुले यांनी वर्णव्यवस्था शोषणकारी आणि अन्यायी आहे हे जाणले. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी वर्णव्यवस्थेच्या विरोधात शिक्षणाला सर्वात मोठे हत्यार मानत वर्णव्यवस्थेवर कठोर प्रहार केले. सामाजिक सुधारणा आणि समता-आधारित समाजाच्या निर्मिती त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. त्यांनी ओढलेल्या आसुडाचे उमटलेले वळ दीडशे वर्षांनंतर मिटलेले नाही. केवळ त्यामुळेच अजूनही त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक गरळ ओकली जाते. त्यांनी 'गुलामगिरी' (१८७३) या पुस्तकात वर्णव्यवस्थेचा मिथकांवर आधारित इतिहास उघड केला आणि टोळीवाल्या भटक्यांनी हिंदूंना गुलाम बनवण्यासाठी धार्मिक ग्रंथांचा कसा गैरवापर केला, यावर प्रकाश टाकला. हिंदू समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक शोषणावर बोट ठेवले. त्यांनी वर्णव्यवस्थेच्या नावाखाली हिंदूंना शिक्षण आणि प्रगतीपासून वंचित ठेवण्याचा कावेबाजपणा उघड केला. ' शेतकऱ्याचा आसूड' (१८८१) च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे आणि शोषणाचे मूळ कारण शोधून त्यावर उपाय सुचवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विश्वास होता की शिक्षण हेच शोषणाविरुद्ध लढण्याचे शिक्षण हेच प्रभावी साधन आहे हे जाणून त्यांनी टोळीवाल्यांच्या हजारों वर्षांच्या अघोषित शैक्षणिक आरक्षणाला सुरुंग लावण्याचे काम करत १८४८ ला मुलींसाठी शाळा स्थापन केली त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन त्यांना शिक्षिका बनवून या कार्यात सामील करून घेतले.

                       कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी शाहू महाराज (कार्यकाल १८९४ ते १९२२) हे त्यांच्या लोकशाहीवादी, समतावादी, सत्यशोधक विचारांसाठी अन् प्रगतीशील धोरणांसाठी प्रसिद्ध होते. महात्मा फुले यांच्यानंतर शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. १८९४ साली राजर्षी शाहू महाराजांनी अधिकारारोहण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या सर्वसाधारण प्रशासनाच्या ७१ पैकी ६० जागांवर ३-४ टक्के असलेला समाज होता. राजर्षी शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी आरक्षणाचा आदेश काढत आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर आरक्षणाला सुरुवात झाली. शाहू महाराजांची आठरापगड जातींना आरक्षण देऊन मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिपाक म्हणून पुढच्या २० वर्षात परिस्थिती हळहळू बदलली व १९२२ मध्ये सर्वसाधारण प्रशासनाच्या एकूण ८५ जागांपैकी ५९ जागांवर बहुजन समाजातील अधिकारी नेमले गेले. आरक्षणाच्या एकूणच धोरणाचा लाभ होणारे देशातील पहिले व्यक्ती प्रसिद्ध कृषितज्ज्ञ जुन्या मुंबई राज्याचे पहिले भारतीय कृषी संचालक व पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य श्री. पांडुरंग चिमणाजी पाटील-थोरात हे होते असे मानले जाते. सामाजिक न्याय आणि समता आधारित समाज निर्माण करणे हे आरक्षणाच्या अंमलबजावणीचे उद्दीष्ट होते. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होवू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी १९१२ मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे ठरविले. १९१७- १८ पर्यंत विनामूल्य प्राथमिक शाळांची संख्या दुप्पट केली.

              १९३०-३२ च्या लंडन येथील राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन अस्पृश्य वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र मतदार संघाची आणि राजकीय हक्कांची मागणी केली. १९३२ मध्ये ब्रिटिश सरकारने दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले.या स्वतंत्र मतदार संघामुळे हिंदू समाजाची विभागणी होईल म्हणून त्याला महात्मा गांधींनी उपोषणाद्वारे विरोध केला. गांधींच्या उपोषणानंतर डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रीय एकतेच्या दृष्टिकोनातून तडजोड करत पुणे करार स्विकारला यामुळे दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित जागा (१४७ जागा) मिळाल्या. पुणे करार भारतातील राजकीय आरक्षणाचा पहिला टप्पा आणि आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे द्योतक आहे. स्वतंत्र भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीने आरक्षण बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे साधन होते. त्यासाठी बहुजन समाजाला शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा हक्क मिळावा म्हणून संविधानाच्या माध्यमातून त्यांनी आरक्षणाला घटनात्मक संरक्षण दिलं. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराजांप्रमाणेच डॉ. आंबेडकरांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन मानले. त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५) आणि डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी स्थापन करून दलित आणि मागासवर्गीयांसाठी शिक्षणाच्या संधी निर्माण केल्या.

                 महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिघांचा जन्म तत्कालीन हिंदू धर्मांतील वेगवेगळ्या जातीतला अन् वेगवेगळ्या पायरीवरचा पण वर्णव्यवस्थेचा फटका तिघांनाही बसला. शाहू महाराज तर राजे असून आणि अगदी वर्णव्यवस्थेनुसारही हिंदू धर्मामध्ये वरच्या पायरीवर असणारे तरीही त्यांनाही वर्णव्यवस्थेचा फटका बसला. एवढेच काय स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, थोरले महाराज छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनाही वर्ण व्यवस्थेचा फटका बसला पण ती वर्णव्यवस्था उखडून टाकण्याचे काम आपआपल्यापरीने प्रत्येकाने केले. जर सर्वच हिंदूंना वर्णव्यवस्थेचा फटका बसला असले तर अशी वर्णव्यवस्था हिंदूंची कशी असू शकते. कोणत्याच धर्मात अशी व्यवस्था नसेल जी आपल्याच धर्मातील सर्वच लोकांना दुय्यम स्थान देईल, थोडक्यात वर्णव्यवस्था ही उपरी आहे आणि ती हिंदू धर्माचा भाग नाही. या युगपुरुषांसोबतच, अनेक संतानी या वर्णव्यवस्थेवर प्रहार करत वर्णव्यस्थेला कमजोर करण्याचे आणि बहुजन हिंदू समाजाला मानवी हक्कांची जाणीव करून देण्याचे कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपआपल्या परीने जन्मजात विशेषाअधिकारांना, आरक्षणाला न जुमानता बहुजन हिंदू समाजाला अनेक क्षेत्रात संधी दिल्या. हजारों वर्षाच्या अघोषित आरक्षणाचे परिमार्जन करण्यासाठी हिंदू बहुजनांना आरक्षणाची संकल्पना मांडून ती पूर्णत्वास नेली त्यामुळे महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजारोंवर्षांच्या आरक्षणाचे खरे मारेकरी आणि हिंदूचे खरे तारणहार आहेत. धर्ममार्तांडाच्या अघोषित आरक्षणाचे कर्दनकाळ आणि समस्त हिंदू समाजाचे तारणहार छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो, महात्मा जोतिराव फुलेंचा विजय असो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.


            जय शिवराय, जय ज्योती जय क्रांती, जय भीम.


                                 संतोबा...

Sunday, September 28, 2025

आरक्षणाचे खरे मारेकरी - फुले, शाहू, आंबेडकर

                    हजारो वर्षे वर्णव्यवस्थेच्या पिंजऱ्यात बंदिस्त केलेल्या हिंदू समाजाला शिक्षणाचा अधिकारच नव्हता. शिक्षणाचा अधिकार फक्त एकाच भारतात आक्रमण करून(आगमन नव्हे) स्थलांतरीत समाजाला, त्यांना शिक्षणाचे पूर्ण आरक्षण. तुरळक अपवाद म्हणून त्या भटक्या आक्रमक समाजाव्यतिरिक्त काहीजण शिकले असतील पण म्हणून अपवादांचे सामान्यीकरण करता येणार नाही. समकालीन सर्वसाधारण शैक्षणिक परिस्थिती काय होती हे महत्त्वाचे. स्वतःपुरते मर्यादित असलेल्या शिक्षणामुळे आपसूकच शारीरिक श्रम अन् कौशल्य वगळता सर्वच क्षेत्रात एकाच समाजाची मक्तेदारी. इथले भूमिपुत्र असलेले सर्व हिंदू शूद्रातिशुद्र, एवढेच काय त्या अघोषित आरक्षित समाजातील महिला देखील शूद्रच. या मूठभर असलेल्या परप्रांतीय समूहाने हजारोंवर्षे येथील हिंदू समाजावर वर्चस्व  गाजवले. या भटक्या समूहाने हिंदू धर्म हायजॅक करत हजारो वर्षे आणि शेकडो पिढ्यांपासून हिंदू समाजाला गुलामगिरीत बंदिस्त केले. या समाजानंतर सुद्धा अनेक आक्रमक आले पण काही वर्षात ते परतले तर काही येथेच राहून येथील समाजाचाच एक भाग बनले.  शक्यतो जेव्हा एखादा व्यक्ती, समूह दोनतीन पिढ्यानंतर जिथे स्थलांतरित झाला आहे त्या समाजाचा, संस्कृतीचा भाग बनून त्यांच्या मिळून मिसळून जातो. पण हा आक्रमक, भटका समूह हजारों वर्षांपासून भारतीय समाजाचा भाग बनू शकला नाही. ज्यावेळी दुसरे त्यांच्या वरचढ आक्रमक आले तेव्हा त्यांनी त्यांच्याशी सूत जुळवून घेतले, त्यांच्यासाठी खर्डेघाशी केली, हेरगिरी केली आणि येथील स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लढवय्या भूमिपुत्रांच्या खबरी तत्कालीन शासनकर्त्यांना देऊन आपला स्वार्थ साधून घेतला. कावेबाजपणा अन् भेदाभेद हेच त्यांच्या टिकून राहण्याचे जालीम हत्यार राहिले आहे. 

                     मूठभर असलेल्या भटक्या स्थलांतरीत लोकांनी एवढ्या मोठ्या प्रदेशावर, लोकांवर वर्णव्यवस्थेचे जोखड लादून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आपला कावेबाजपणा उघड झाला तर आपले अस्तित्व धोक्यात येईल याची जाणीव त्यांना होती म्हणून त्यांनी वर्णव्यवस्थेची उतरंड अशाप्रकारे निर्माण केली की, त्या उतरंडीमध्ये स्वतःला शिरोभागी ठेवत, सर्वाधिकार आपल्याकडे ठेऊन उतरंडीनुसार कमीतकमी अधिकार देऊन स्वतःचे वर्चस्व चिरंतन राहण्यासाठी वर्णव्यवस्था ही परिसंस्था (इकोसिस्टिम) निर्माण केली. या उतरंडीच्या खालच्या पायरीवर असलेल्यांना वरच्या पायरीवर असलेल्यांच्या मेहरबानीवर जगावे लागत होते. थोडक्यात खालच्या पायरीवर असलेला वरच्या पायरीवर असलेल्याचा सेवेकरी आणि अर्थातच सर्वात शिरोभागी असलेला केवळ मेवेकरी. त्यामुळे तळात असलेल्या समाजाचे जगणं प्रचंड खडतर आणि हलाखीचे होते. या विषमतावादी वर्णव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक समूह वर्णव्यवस्थेचा कमी अधिक प्रमाणात पिडित असला तरी, वर्णव्यवस्थेच्या पिंजऱ्यात अशाप्रकारे अडकला की त्याला आपल्यापेक्षा कोणीतरी खालच्या पायरीवर आहे आणि आपण केवळ वरच्या पायरीवर असलेल्या समाजात जन्माला आलो आहोत म्हणून आपले काही कर्तृत्व नसताना खालच्या पायरीवर असलेल्यांवर वर्चस्व गाजवू शकतो या भावनेनेच सुखावतो. पण त्याच्या हे लक्षात येत नाही की सगळ्यात शिरोभागी असलेल्या भटक्या, परक्या समूहाला सर्वाधिकार आहे आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांना इतरांसारखी शिक्षा नाही. ते कितीही नितीभ्रष्ट झाले तरी सर्वश्रेष्ठच राहतील. ते स्वतःला केवळ हिंदूच समाजच नव्हे तर हिंदूच्या देवदेवतांच्यापेक्षाही श्रेष्ठ समजतात पण हे शिक्षणाअभावी त्यांच्या कधीच लक्षात आले नाही आणि हिंदू नसलेल्या उपऱ्या समाजाला हिंदूंचे तारणहार समजून त्यांचे वर्चस्व आणि हिंदू धर्माच्या व्यवस्थेचा भाग नसलेल्या उपऱ्या वर्णव्यवस्थेचे जोखड हिंदूसमाज हजारों वर्षापासून आनंदाने वाहत आहे आणि म्हणूनच आजसुद्धा आपली योग्यता आपली जात ठरवते आणि त्यानुसार आपल्याशी व्यवहार केला जातो. 

                  जगभरात धर्मसत्ता राजसत्तेवर पर्यायाने सामान्य जनतेवर वर्चस्व गाजवत असताना भारतात छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मसत्तेचे वर्चस्व, अन्याय्य रूढी-परंपरा मोडीत काढत रयतेचे स्वराज्य निर्माण केले. तत्कालीन धर्ममार्तंडानी शिवाजी महाराजांना 'शूद्र' म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला कारण वर्णव्यवस्थेनुसार, शूद्रांना राज्याभिषेक (राज्यारोहण) करण्याचा अधिकार नव्हता. शिवाजी महाराज आधीच रयतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान होते त्यांनी राज्याभिषेक नसता केला तरी त्यांच्या कर्तृत्वात उणेपणा आला नसता पण त्यांच्या समकालीन इतर शासकांच्या दृष्टीने स्वराज्याला स्वतंत्र, सार्वभौम राज्य आणि परकीय शासकांशी व्यापार आणि लष्करी करार करण्यासाठी शिवाजी महाराजांना 'छत्रपती' म्हणून मान्यता मिळवण्यासाठी राज्याभिषेक गरजेचा होता आणि तो त्यांनी स्थानिक धर्ममार्तंडांचा विरोध झुगारून आपल्या गनिमी काव्याने करवून घेतला. याशिवाय शूद्रांना शस्त्र धारण करण्यास मनाई होती, शिवरायांनी हे नियम मोडत अठरापगड जातींना आपल्या लष्करता सामावून घेतले.  धर्ममार्तंडानी केवळ अधिकारासाठीच नव्हे तर गुन्ह्यातील शिक्षेत सूट मिळावी म्हणून स्वतः साठी जन्मजात विशेषाअधिकारांची तजवीज केली होती. धर्ममार्तंड स्वतःला भुदेव समजत होते व त्यांची हत्या म्हणजे मोठे पातक समजले जात होते. महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण करताना स्वराज्याच्या हिताआड येणाऱ्या धर्ममार्तंडांचे लाड न करता फितूर झालेल्यांची गर्दन मारताना बिल्कुल मुलाहिजा राखला नाही. थोडक्यात शिवरायांनी जन्मजात विशेषाधिकराचे जे अघोषित आरक्षण होते त्याचा कडेलोट केला. शिवरायांच्या या धोरणांमुळे जन्मजात वर्णव्यवस्थेची बंधने तोडता येतात याचा विश्वास समाजामध्ये निर्माण झाला. साम्राज्ये अनेकांनी उभारली पण एखाद्या प्रगल्भ लोकशाहीला हेवा वाटेल असे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारले.  लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरावी, लोककल्याणाचे, रयतेचे राज्य कसे असावे याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला. हा वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे चालवताना स्वराज्यद्रोही तथाकथित भूदेवांना हत्तीच्या पायाखाली दिले.  

              शिक्षणाअभावी गुलामीत जगणाऱ्या देशातील हिंदूंच्या दुरावस्थेचे निदान महात्मा जोतीराव फुले यांनी  एकाच कडव्यात प्रभावीपणे केले आहे. 

                    विद्येविना मती गेली। 

                    मतिविना नीती गेली। 

                    नीतिविना गती गेली। 

                    गतिविना वित्त गेले। 

                    वित्ताविना शूद्र खचले। 

             इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

महात्मा ज्योतिराव फुले यांनी वर्णव्यवस्था शोषणकारी आणि अन्यायी आहे हे जाणले. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी वर्णव्यवस्थेच्या विरोधात शिक्षणाला सर्वात मोठे हत्यार मानत वर्णव्यवस्थेवर कठोर प्रहार केले. सामाजिक सुधारणा आणि समता-आधारित समाजाच्या निर्मिती त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. त्यांनी ओढलेल्या आसुडाचे उमटलेले वळ दीडशे वर्षांनंतर मिटलेले नाही. केवळ त्यामुळेच अजूनही त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक गरळ ओकली जाते. त्यांनी 'गुलामगिरी' (१८७३) या पुस्तकात वर्णव्यवस्थेचा मिथकांवर आधारित इतिहास उघड केला आणि टोळीवाल्या भटक्यांनी हिंदूंना गुलाम बनवण्यासाठी धार्मिक ग्रंथांचा कसा गैरवापर केला, यावर प्रकाश टाकला. हिंदू समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक शोषणावर बोट ठेवले. त्यांनी वर्णव्यवस्थेच्या नावाखाली हिंदूंना शिक्षण आणि प्रगतीपासून वंचित ठेवण्याचा कावेबाजपणा उघड केला. ' शेतकऱ्याचा आसूड' (१८८१) च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे आणि शोषणाचे मूळ कारण शोधून त्यावर उपाय सुचवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विश्वास होता की शिक्षण हेच शोषणाविरुद्ध लढण्याचे शिक्षण हेच प्रभावी साधन आहे हे जाणून त्यांनी टोळीवाल्यांच्या हजारों वर्षांच्या अघोषित शैक्षणिक आरक्षणाला सुरुंग लावण्याचे काम करत १८४८ ला मुलींसाठी शाळा स्थापन केली त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन त्यांना शिक्षिका बनवून या कार्यात सामील करून घेतले.

                       कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी शाहू महाराज (कार्यकाल १८९४ ते १९२२)  हे त्यांच्या लोकशाहीवादी, समतावादी, सत्यशोधक विचारांसाठी अन् प्रगतीशील धोरणांसाठी प्रसिद्ध होते. महात्मा फुले यांच्यानंतर शाहू महाराजांनी  सत्यशोधक चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. १८९४ साली राजर्षी शाहू महाराजांनी अधिकारारोहण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या सर्वसाधारण प्रशासनाच्या ७१ पैकी ६० जागांवर ३-४ टक्के असलेला समाज होता. राजर्षी शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी आरक्षणाचा आदेश काढत आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर आरक्षणाला सुरुवात झाली. शाहू महाराजांची आठरापगड जातींना आरक्षण देऊन मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिपाक म्हणून पुढच्या २० वर्षात परिस्थिती हळहळू बदलली व १९२२ मध्ये सर्वसाधारण प्रशासनाच्या एकूण ८५ जागांपैकी ५९ जागांवर बहुजन समाजातील अधिकारी नेमले गेले. आरक्षणाच्या एकूणच धोरणाचा लाभ होणारे देशातील पहिले व्यक्ती प्रसिद्ध कृषितज्ज्ञ जुन्या मुंबई राज्याचे पहिले भारतीय कृषी संचालक व पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य श्री. पांडुरंग चिमणाजी पाटील-थोरात हे होते असे मानले जाते. सामाजिक न्याय आणि समता आधारित समाज निर्माण करणे हे आरक्षणाच्या अंमलबजावणीचे उद्दीष्ट होते. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होवू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी १९१२ मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे ठरविले. १९१७- १८ पर्यंत विनामूल्य प्राथमिक शाळांची संख्या दुप्पट केली.

              १९३०-३२ च्या लंडन येथील राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन अस्पृश्य वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र मतदार संघाची आणि राजकीय हक्कांची मागणी केली. १९३२ मध्ये ब्रिटिश सरकारने दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले.या स्वतंत्र मतदार संघामुळे हिंदू समाजाची विभागणी होईल म्हणून त्याला महात्मा गांधींनी उपोषणाद्वारे विरोध केला. गांधींच्या उपोषणानंतर डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रीय एकतेच्या दृष्टिकोनातून तडजोड करत पुणे करार स्विकारला यामुळे दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित जागा (१४७ जागा) मिळाल्या. पुणे करार भारतातील राजकीय आरक्षणाचा पहिला टप्पा आणि आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे द्योतक आहे. स्वतंत्र भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीने आरक्षण बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे साधन होते. त्यासाठी बहुजन समाजाला शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा हक्क मिळावा म्हणून संविधानाच्या माध्यमातून त्यांनी आरक्षणाला घटनात्मक संरक्षण दिलं. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराजांप्रमाणेच डॉ. आंबेडकरांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन मानले. त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५) आणि डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी स्थापन करून दलित आणि मागासवर्गीयांसाठी शिक्षणाच्या संधी निर्माण केल्या.

                 महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिघांचा जन्म तत्कालीन हिंदू धर्मांतील वेगवेगळ्या जातीतला अन् वेगवेगळ्या पायरीवरचा पण वर्णव्यवस्थेचा फटका तिघांनाही बसला. शाहू महाराज तर राजे असून आणि अगदी वर्णव्यवस्थेनुसारही हिंदू धर्मामध्ये वरच्या पायरीवर असणारे तरीही त्यांनाही वर्णव्यवस्थेचा फटका बसला. एवढेच काय स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, थोरले महाराज छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनाही वर्ण व्यवस्थेचा फटका बसला पण ती वर्णव्यवस्था उखडून टाकण्याचे काम आपआपल्यापरीने प्रत्येकाने केले. जर सर्वच हिंदूंना वर्णव्यवस्थेचा फटका बसला असले तर अशी वर्णव्यवस्था हिंदूंची कशी असू शकते. कोणत्याच धर्मात अशी व्यवस्था नसेल जी आपल्याच धर्मातील सर्वच लोकांना दुय्यम स्थान देईल, थोडक्यात वर्णव्यवस्था ही उपरी आहे आणि ती हिंदू धर्माचा भाग नाही. या युगपुरुषांसोबतच, अनेक संतानी या वर्णव्यवस्थेवर प्रहार करत वर्णव्यस्थेला कमजोर करण्याचे आणि बहुजन हिंदू समाजाला मानवी हक्कांची जाणीव करून देण्याचे कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपआपल्या परीने जन्मजात विशेषाअधिकारांना, आरक्षणाला न जुमानता बहुजन हिंदू समाजाला अनेक क्षेत्रात संधी दिल्या. हजारों वर्षाच्या अघोषित आरक्षणाचे परिमार्जन करण्यासाठी हिंदू बहुजनांना आरक्षणाची संकल्पना मांडून ती पूर्णत्वास नेली त्यामुळे महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.  बाबासाहेब आंबेडकर हजारोंवर्षांच्या आरक्षणाचे खरे मारेकरी आणि हिंदूचे खरे तारणहार आहेत. धर्ममार्तांडाच्या अघोषित आरक्षणाचे कर्दनकाळ आणि समस्त हिंदू समाजाचे तारणहार छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो, महात्मा जोतिराव फुलेंचा विजय असो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.

            जय शिवराय, जय ज्योती जय क्रांती, जय भीम.

                                 संतोबा...

Tuesday, September 23, 2025

 हजारो वर्षे वर्णव्यवस्थेच्या पिंजऱ्यात बंदिस्त केलेल्या हिंदू समाजाला शिक्षणाचा अधिकारच नव्हता. शिक्षणाचा अधिकार फक्त एकाच भारतात आक्रमण करून(आगमन नव्हे) स्थलांतरीत समाजाला, त्यांना शिक्षणाचे पूर्ण आरक्षण. तुरळक अपवाद म्हणून काही त्या आक्रमक समाजाव्यतिरिक्त काहीजण शिकले असतील पण म्हणून अपवादांचे सामान्यीकरण करता येणार नाही. समकालीन सर्वसाधारण शैक्षणिक परिस्थिती काय होती हे महत्त्वाचे. स्वतःपुरते मर्यादित असलेल्या शिक्षणामुळे आपसूकच शारीरिक श्रम अन् कौशल्य वगळता सर्वच क्षेत्रात एकाच समाजाची मक्तेदारी. इथले भूमिपुत्र असलेले सर्व हिंदू शूद्रातिशुद्र, एवढेच काय त्या अघोषित आरक्षित समाजातील महिला देखील शूद्रच. या मूठभर असलेल्या परप्रांतीय समूहाने हजारोंवर्षे येथील हिंदू समाजावर वर्चस्व गाजवले. या भटक्या समूहाने हिंदू धर्म हायजॅक करत हजारो वर्षे आणि शेकडो पिढ्यांपासून हिंदू समाजाला गुलामगिरीत बंदिस्त केले. या समाजानंतर सुद्धा अनेक आक्रमक आले पण काही वर्षात ते परतले तर काही येथेच राहून येथील समाजाचाच एक भाग बनले. शक्यतो जेव्हा एखादा व्यक्ती, समूह दोनतीन पिढ्यानंतर जिथे स्थलांतरित झाला आहे त्या समाजाचा, संस्कृतीचा भाग बनून त्यांच्या मिळून मिसळून जातो. पण हा आक्रमक, भटका समूह हजारों वर्षांपासून भारतीय समाजाचा भाग बनू शकला नाही. ज्यावेळी दुसरे त्यांच्या वरचढ आक्रमक आले तेव्हा त्यांनी त्यांच्याशी सूत जुळवून घेतले, त्यांच्यासाठी खर्डेघाशी केली, हेरगिरी केली आणि येथील स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लढवय्या भूमिपुत्रांच्या खबरी तत्कालीन शासनकर्त्यांना देऊन आपला स्वार्थ साधून घेतला. कावेबाजपणा अन् भेदाभेद हेच त्याचे जालीम हत्यार राहिले आहे. 


                     मूठभर असलेल्या भटक्या स्थलांतरीत लोकांनी एवढ्या मोठ्या प्रदेशावर, लोकांवर वर्णव्यवस्थेचे जोखड लादून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आपला कावेबाजपणा उघड झाला तर आपले अस्तित्व धोक्यात येईल याची जाणीव त्यांना होती म्हणून त्यांनी वर्णव्यवस्थेची उतरंड अशाप्रकारे निर्माण केली की, त्या उतरंडीमध्ये स्वतःला शिरोभागी ठेवत, सर्वाधिकार आपल्याकडे ठेऊन उतरंडीनुसार कमीतकमी अधिकार देऊन स्वतःचे वर्चस्व चिरंतन राहण्यासाठी वर्णव्यवस्था ही परिसंस्था (इकोसिस्टिम) निर्माण केली. या उतरंडीच्या खालच्या पायरीवर असलेल्यांना वरच्या पायरीवर असलेल्यांच्या मेहरबानीवर जगावे लागत होते. थोडक्यात खालच्या पायरीवर असलेला वरच्या पायरीवर असलेल्याचा सेवेकरी आणि अर्थातच सर्वात शिरोभागी असलेला केवळ मेवेकरी. त्यामुळे तळात असलेल्या समाजाचे जगणं प्रचंड खडतर आणि हलाखीचे होते. या विषमतावादी वर्णव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक समूह वर्णव्यवस्थेचा कमी अधिक प्रमाणात पिडित असला तरी, वर्णव्यवस्थेच्या पिंजऱ्यात अशाप्रकारे अडकला की त्याला आपल्यापेक्षा कोणीतरी खालच्या पायरीवर आहे आणि आपण केवळ वरच्या पायरीवर असलेल्या समाजात जन्माला आलो आहोत म्हणून आपले काही कर्तृत्व नसताना खालच्या पायरीवर असलेल्यांवर वर्चस्व गाजवू शकतो या भावनेनेच सुखावतो. पण त्याच्या हे लक्षात येत नाही की सगळ्यात शिरोभागी असलेल्या भटक्या, परक्या समूहाला सर्वाधिकार आहे आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांना इतरांसारखी शिक्षा नाही. ते कितीही नितीभ्रष्ट झाले तरी सर्वश्रेष्ठच राहतील. ते स्वतःला केवळ हिंदूच समाजच नव्हे तर हिंदूच्या देवदेवतांच्यापेक्षाही श्रेष्ठ समजतात पण हे शिक्षणाअभावी त्यांच्या कधीच लक्षात आले नाही आणि हिंदू नसलेल्या उपऱ्या समाजाला हिंदूंचे तारणहार समजून त्यांचे वर्चस्व आणि हिंदू धर्माच्या व्यवस्थेचा भाग नसलेल्या उपऱ्या वर्णव्यवस्थेचे जोखड हिंदूसमाज हजारों वर्षापासून आनंदाने वाहत आहे आणि म्हणूनच आजसुद्धा आपली योग्यता आपली जात ठरवते आणि त्यानुसार आपल्याशी व्यवहार केला जातो. 


              शिक्षणाअभावी गुलामीत जगणाऱ्या देशातील हिंदूंच्या दुरावस्थेचे निदान महात्मा जोतीराव फुले यांनी एकाच कडव्यात प्रभावीपणे केले आहे. 

                    विद्येविना मती गेली। 

                    मतिविना नीती गेली। 

                    नीतिविना गती गेली। 

                    गतिविना वित्त गेले। 

                    वित्ताविना शूद्र खचले। 

             इतके अनर्थ एका अविद्येने केले।।


महात्मा ज्योतिराव फुले यांनी वर्णव्यवस्था शोषणकारी आणि अन्यायी आहे हे जाणले. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी वर्णव्यवस्थेच्या विरोधात शिक्षणाला सर्वात मोठे हत्यार मानत वर्णव्यवस्थेवर कठोर प्रहार केले. सामाजिक सुधारणा आणि समता-आधारित समाजाच्या निर्मिती त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. त्यांनी ओढलेल्या आसुडाचे उमटलेले वळ दीडशे वर्षांनंतर मिटलेले नाही. केवळ त्यामुळेच अजूनही त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक गरळ ओकली जाते. त्यांनी 'गुलामगिरी' (१८७३) या पुस्तकात वर्णव्यवस्थेचा मिथकांवर आधारित इतिहास उघड केला आणि टोळीवाल्या भटक्यांनी हिंदूंना गुलाम बनवण्यासाठी धार्मिक ग्रंथांचा कसा गैरवापर केला, यावर प्रकाश टाकला. हिंदू समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक शोषणावर बोट ठेवले. त्यांनी वर्णव्यवस्थेच्या नावाखाली हिंदूंना शिक्षण आणि प्रगतीपासून वंचित ठेवण्याचा कावेबाजपणा उघड केला. ' शेतकऱ्याचा आसूड' (१८८१) च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे आणि शोषणाचे मूळ कारण शोधून त्यावर उपाय सुचवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विश्वास होता की शिक्षण हेच शोषणाविरुद्ध लढण्याचे शिक्षण हेच प्रभावी साधन आहे हे जाणून त्यांनी टोळीवाल्यांच्या हजारों वर्षांच्या अघोषित शैक्षणिक आरक्षणाला सुरुंग लावण्याचे काम करत १८४८ ला मुलींसाठी शाळा स्थापन केली त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन त्यांना शिक्षिका बनवून या कार्यात सामील करून घेतले.


                       कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी शाहू महाराज (कार्यकाल १८९४ ते १९२२) हे त्यांच्या लोकशाहीवादी, समतावादी, सत्यशोधक विचारांसाठी अन् प्रगतीशील धोरणांसाठी प्रसिद्ध होते. महात्मा फुले यांच्यानंतर शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. १८९४ साली राजर्षी शाहू महाराजांनी अधिकारारोहण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या सर्वसाधारण प्रशासनाच्या ७१ पैकी ६० जागांवर ३-४ टक्के असलेला समाज होता. राजर्षी शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी आरक्षणाचा आदेश काढत आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर आरक्षणाला सुरुवात झाली. शाहू महाराजांची आठरापगड जातींना आरक्षण देऊन मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिपाक म्हणून पुढच्या २० वर्षात परिस्थिती हळहळू बदलली व १९२२ मध्ये सर्वसाधारण प्रशासनाच्या एकूण ८५ जागांपैकी ५९ जागांवर बहुजन समाजातील अधिकारी नेमले गेले. आरक्षणाच्या एकूणच धोरणाचा लाभ होणारे देशातील पहिले व्यक्ती प्रसिद्ध कृषितज्ज्ञ जुन्या मुंबई राज्याचे पहिले भारतीय कृषी संचालक व पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य श्री. पांडुरंग चिमणाजी पाटील-थोरात हे होते असे मानले जाते. सामाजिक न्याय आणि समता आधारित समाज निर्माण करणे हे आरक्षणाच्या अंमलबजावणीचे उद्दीष्ट होते. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होवू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी १९१२ मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे ठरविले. १९१७- १८ पर्यंत विनामूल्य प्राथमिक शाळांची संख्या दुप्प

ट केली.



Saturday, August 2, 2025

चांगभलं होता होता

चांगभलं होता होता, स्वप्ने सारी उद्ध्वस्त झाली.
अरे पुन्हा सत्तेतून हटवा, दलालांचे वाली. 

आम्ही पोकळ आश्वासनांची ही, पालखी का वहावी.
जे कधी मिळणार नव्हते, त्याची आस का बाळगावी.
कशी जेलात जाणाऱ्यांची, मंत्रीमंडळी वर्णी लागली.

तोऱ्यात केली त्यांनी, कायदा सुव्यवस्थेची माती.
आम्हांवरी कारवाईची, तलवार कायम लटकती.
आम्ही ते विवेकी, ज्यांना शोषित ही ना वाली.

उभा पक्ष झाला आता भ्रष्ट, गुंडांची बंदिशाला.
जिथे कलंकितांना, मंत्रिपदाचा प्रसाद मिळाला.
कसे हे निष्ठावंत दुर्देवी अन गद्दार भाग्यशाली.

धुमसतात अजुनी मेल्या, वर्णश्रेष्ठत्वाचे निखारे.
अजूनही द्वेष पेरत फिरती, कट्टरतावादी सारे.
आश्वासनेच जन सुरक्षतेची, आम्हाला मिळाली !

तेच जुने डाव पुन्हा टाकती, फिरुनी नवे सत्ताधारी.
तेच गळफास लावती, सिंहासनावरचे नाग विषारी.
आम्ही मात्र पोसत राहतो, त्याच त्या विषवल्ली.

अशी कशी ज्याने त्याने ठेवली, बुद्धी गहाण?
असे कसे हे जहागिरदार, सत्तेस गेले शरण?
कशी लाचार शहेनशहांनी, पत्करली ही दलाली?.
                                       संतोबा ...

Tuesday, July 29, 2025

चांगभलं होता होता

चांगभलं होता होता, स्वप्ने सारी उद्ध्वस्त झाली.
अरे पुन्हा सत्तेतून हटवा, दलालांचे वाली. 

आम्ही दिल्या पोकळ आश्वासनांची, पालखी का वहावी.
जे कधी सिद्धीस जाणार नव्हते, त्याची आस का बाळगावी.
कशी जेलात जाणाऱ्यांची, मंत्रीमंडळात वर्णी लागली.

तेच जुने डाव पुन्हा टाकती, फिरुनी नवे सत्ताधारी.
तेच गळफास लावती, सिंहासनावरचे नाग विषारी.
आम्ही मात्र पोसत राहतो, त्याच त्या विषवल्ली.

अन्यायाच्या चिखलात, कशी द्वेषाची बाग फुलवती.
आम्हांवरी कारवाईची, तलवार सदा लटकती.
आम्ही ते विवेकी, ज्यांना शोषित ही ना वाली.

अशी कशी ज्याने त्याने ठेवली बुद्धी गहाण?
असा कसा जो तो जहागिरदार सत्तेस शरण?
ह्या लाचार शहेनशहांनी का पत्करली दलाली?.

उभा पक्ष झाला आता, भ्रष्टांची बंदिशाला
जिथे कलंकितांना, मंत्रिपदाचा प्रसाद मिळाला.
कसे निष्ठावंत दुर्देवी अन गद्दार भाग्यशाली.

मोकाट फिरतात अजुनी, हल्लेखोर दहशतवादी.
अजून उसवती समतेची वीण, सारे कट्टरतावादी.
आश्वासनेच जन सुरक्षतेची आम्हाला मिळाली !

                                       संतोबा ...

Wednesday, July 16, 2025

नतद्रष्ट

सारं आहे तोट्यात दाखवून, विका सर्व.
असा हा नवभारत, अन् असे हे विकासपर्व.
घोटाळेबाज दल्ले, राजरोस लुबाडती खर्व.
अन् आम्हाला केवळ, वांझोट्या गोष्टींचा गर्व.

दीन दुबळ्यांना झोडपणे, हे असे त्यांचे शौर्य.
अन् अन्यायाविरुद्धचा लढा वाटे त्यांना कौर्य.
जनतेस लावी देशोधडीला, एवढेच त्यांचे कार्य. 
कोहळा घेऊन आवळा देणे, हे त्यांचे औदार्य.

साऱ्या घोटाळ्यांचे, गाडीभर पुरावे यांच्या संग्रही.
नोटीशी पाठवून त्यांना, सोबत घेण्या हे आग्रही.
व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या संकल्पी हे निग्रही.
जे जे त्यांच्या विरोधात, ते सारे देव,धर्म,देशद्रोही.

कुबेरा श्रीमंत करण्या, ठेवती सारं काही गहाण.
काबाडकष्ट करणाऱ्याच्या वाट्यास, येई मरण. 
राक्षसी सत्ता, गडगंज संपत्तीपुढे होती सारे शरण.
पडद्या-मैदानावरचे सारे वाघही, घालती लोटांगण.

गतकाळाची ओढ यांना, नको भविष्याची पायाभरणी.
बेजबाबदार सारे,  फलद्रूप होईना यांची एकही करणी.
निष्फळता लपविती, गात गतअग्रणीच्या नावे रडगाणी.
कायदे बदलून नितीभ्रष्ट होती पावन, करण्या मनमानी.
                                       संतोबा ....

Sunday, June 22, 2025

आधारवड

मी कर्ता, मीच करविता, मी साऱ्यांचा भाग्यविधाता. 
आसमानी,सुलतानी संकटी, मी संकटमोचक विघ्नहर्ता. 

कष्टकऱ्यांचा नेता मी, भांडवलदारांचा सारथी मी. 
सर्वांच्या यशातील वाटा मी, असा आहे मी असामी.

चेहरा माझा पुरोगामी, प्रतिगाम्यांचाही आधार मी.  
दोन्ही दगडी पाय माझा, पडद्यामागचा सुत्रधार मी.

अगम्य माझ्या चाली अन् लवचिक माझी विचारधारा.
दोन्हीकडे ऊठबस माझी. संकटी जो मी त्याच्या आधारा.  

अकल्‍पित माझ्या भूमिका, कधी कोणाला देतो टाळी.
घडो काहीही कुठेही, साऱ्यांना वाटे माझीच ही खेळी.

आपले साऱ्यांशीच सख्य, नाही कोणाशी कसले वैर.
न बोलल्या शब्दांबाहेर जो माझ्या, नाही त्याची खैर.

सत्तेच्या सारीपाटापायी, अलत्याभलत्यांशी लावतो पाट.
वेळोवेळी, भल्याभल्यांना दाखवतो मी कात्रजचा घाट.

रुजवली मी जी विषवल्ली, भिडे तिचा फास माझ्या गळा. 
उद्ध्वस्त केली तरुणाई तिने, मनी फुलवला द्वेषाचा मळा.

निकराच्या लढाईत, डाव जिंकताना तह मी केला.
बेरजेच्या राजकारणात, विश्वास मात्र वजा झाला.

कमावला नावलौकिक, तरी पाठ सोडेना खंजीर. 
वैऱ्यास सामील झाले सांगाती, तोडून नात्यांची जंजीर.     


                                                       संतोबा...

Saturday, June 14, 2025

जागृती

मत आमचे, ईव्हीएम तुमची.
देश आमचा, सत्ता तुमची.
राज्य आमचं, राजकारण तुमचं.
दरबार आमचा, कारभार तुमचा. 
निष्ठा आमची, प्रतिष्ठा तुमची.

सातबारा आमचा, शिक्का तुमचा.
पिकं आमची, दर तुमचा.
कष्ट आमचे, कर तुमचा.
फास आम्हाला, घास तुम्हाला.
उपाशी आम्ही, तुपाशी तुम्ही.

योजना आमच्या, लालफित तुमची.
हतबल आम्ही, बलवान तुम्ही.
अस्वस्थ आम्ही, आश्वस्त तुम्ही. 
हाल आमचे, व्यवस्था तुमची.
खड्डेखुड्डे आम्हाला, पायघड्या तुम्हाला.

धर्म आमचा, बंधने तुमची. 
सेवा आमची, मेवा तुमचा. 
श्रद्धा आमची, धंदा तुमचा.
तिजोरी आमची, किल्ली तुमची.
घाव आम्हाला, भाव तुम्हाला. 

जुलमी राजवट, निर्दयी व्यवस्था तुमची.
ती उद्ध्वस्त करण्याची ताकद आमची.
देव,देश,धर्माच्या बाजारीकरणाचे हस्तक तुम्ही.
तथ्य जाणून सत्यशोधन करणारे मस्तक आम्ही.
क्षणभंगुर वर्चस्ववाद तुमचा, शाश्वत समता आमची.

                                            संतोबा...

Sunday, May 4, 2025

पुरंदर विमानतळ - शासन प्रशासनाची मनमानी

             या लोकांच्या हातात तलवारी, बंदूका नाहीत, या लोकांनी कोणावरही आक्रमण केलेले नाही. मग एवढा फौजफाटा कशासाठी?. एवढा फौजफाटा त्यांना रोखण्यासाठी तैनात करावा लागण्याइतपत हे लोक डेंजर - धोकादायक आहेत का?. हे लोक आपल्या अस्तित्वासाठी हक्कासाठी एकत्र आले आहेत. आपली मालकी हक्काची घरे, शेतजमीन, संसार वाचवण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देणे गुन्हा आहे का?. दुपारच्या रखरखत्या उन्हात वृद्ध, महिला, असाह्य शेतकऱ्यांवर आपण गुन्हेगारांवर कारवाई करतोय अशा प्रकारे अमानुष लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने केला गेला?. आपल्या हक्काची जाणीव असलेला व्यक्ती सत्ताधाऱ्यांसाठी धोकादायक असतो. सत्ताधारी एकवेळ गुन्हेगारांना सोडतील पण आपल्या हक्काची जाणीव असलेल्या व्यक्तीला कदापी सोडणार नाहीत. सात-आठ वर्षापासून चाललेल्या या संकटाच्या धसक्याने बाधीत गावातील काही व्यक्ती दगावल्या आहे. थोडाबहुत शिल्लक असलेला निसर्ग ओरबाडून, भूमिपुत्रांवर जबरदस्तीने परागंदा व्हायला भाग पाडण्याच्या प्रयत्न करणारी ही मोगलाई कोणाच्या भल्यासाठी आहे. भांडवलदारांचे हितसंबंध आणि दलालांचे लागेबांधे कष्टकरी बळीराजाच्या जीवावर बेतले आहेत. हा प्रकल्प करण्याची निकड आणि तो इथेच करण्याचा हट्ट का आहे?.

                    गेल्या सात-आठ वर्षात एकदाही कोणाला निर्हेतुकपणे येथील भूमिपुत्रांशी सल्लामसलत करायची गरज वाटली नाही. जे आले ते केवळ प्रकल्पाची वकिली करण्यासाठी आले. कोणीही आम्हाला विकासाचे गाजर दाखवू नका, बळीराजाची, भूमिपुत्रांची कोणाला किती फिकीर आहे त्याचे कौतुक आम्हाला सांगू नका आणि आमच्या भल्याचा बाजारगप्पाही मारू नका, तुम्हाला आमची किती काळजी आहे ते आम्ही जाणतो. शेतीमाल परदेशी निर्यात करता येईल ही थाप मारण्यापूर्वी शेतीसाठी मुबलक वीज,पाणी याची व्यवस्था केली आहे का? बोगस बियाणे, बोगस रासायनिक खते, बोगस तणनाशक, बोगस कीटकनाशके यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय प्रयत्न केले आहेत का?. आणि सर्वात महत्वाचे आम्ही भूमिहीन झाल्यावर शेती कुठे आणि कशी करणार? अंतराळात शेती करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे का?. तुमच्या पोकळ आश्वासनाने आमच्या पुढील जगण्याची कठीण आव्हाने संपणार नाहीत. ज्यांचा शेती हा धर्म अन् कर्म आहे त्यांच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. त्याचबरोबर अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर घटकांचाही हा प्रश्न आहे. या संकटाची जाणीव त्यांनाही होणे गरजेचे आहे आणि हा लढा त्यांचाही व्हायला हवा. 

                   या ब्रह्म राक्षसापुढे निसर्ग मूक आहे आणि भूमिपुत्र हतबल आहे. निसर्गावर बुलडोझर चालवून तुम्ही तो उद्ध्वस्त कराल पण निसर्ग सर्वशक्तिमान आहे तो तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. निसर्गाचा आणि भूमिपुत्रांचा तळतळाट तुमच्या सर्वनाशास कारणीभूत ठरेल एवढा अन्याय करू नका. या प्रकल्पाची झळ फक्त बाधित भूमिपुत्रांना बसणार नाहीतर आजुबाजूच्या सर्वांनाच बसणार आहे. पैशाच्या जोरावर साऱ्याच गोष्टी विकत घेता येत नाही, नैसर्गिक साधनस्रोत मर्यादित आहेत. आधीच पाण्याची विजेची टंचाई आहे. पाणी आणि विजेसाठी उद्योगधंद्यांना प्राथमिकता दिली जाते आणि शिल्लक राहिल्यावर शेतीसाठी. त्याचप्रमाणे विकासाच्या पंचपक्वानांवर भांडवलदार आणि दलाल ताव मारतील आणि सर्वसामान्यांच्या वाट्याला उष्ट्या पत्रावळी येतील. या प्रकल्पाला संपूर्ण जिल्ह्यातील लोकांनी विरोध करणे गरजेचे आहे. आज शहरात रहदारीचा प्रश्न भेडसावत आहे, जगात रहदारीच्या बाबतीत पुणे चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्याबरोबरीने वर्षागणिक येथील प्रदूषण आणि तापमान वाढत आहे. शहरात लोकांनी कोटीमध्ये किंमत असलेले फ्लॅट घेतले आहेत पण पायभूत सुविधांचा बोजवारा वाजला आहे आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, निर्भेळ अन्न कितीही पैसे देऊन विकत मिळणार नाही आणि पर्यायाने निरोगी शरीर आणि आरोग्यही मिळणार नाही. 

                हा निसर्ग भकास करून होणारा विकास भांडवलदार आणि दलाल वगळता कोणाच्याही फायद्याचा नाही. त्यामुळे सर्वांनी आपआपल्यापरीने विरोध आणि घटनेचा निषेध करायला हवा. सध्या चाललेला भूमिपुत्रांचा तीव्र विरोध जर दुर्दैवाने शासनप्रशासनाने बळजबरीने चिरडला तर पुढे होणारा विध्वंस कोणालाही थांबवता येणार नाही. वेळ निघून गेल्यानंतर उपरती होऊन काहीही फायदा होणार नाही. आणि कोणी कितीही प्रामाणिक प्रयत्न केले तरी त्याची भरपाई होऊ शकणार नाही. आज जे हा प्रकल्प राबवण्यासाठी झटत आहेत तेही कोणाचे ना कोणाचे प्यादे आहेत, त्यांना तात्पुरता फायदा होईल पण कधी ना कधी त्यांनाही पश्चात्ताप करायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. जे प्रकल्पाचे समर्थन करत आहेत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा. त्यांनी तात्पुरता फायद्याच्या विचार न करता शाश्वत फायद्याचा विचार करायला हवा. परक्यांना आपल्या उरावर बसू देऊ नका, येणाऱ्या पिढ्यांचा विचार करा. त्यांच्यासाठी काहीतरी वारसा जपून ठेवा. आपल्याच गावात, तालुक्यात त्यांना उपरे म्हणून कोणाच्या हाताखाली हमाली करायची वेळ येऊ देऊ नका. 

                  शेवटी शासन प्रशासनाला विनंती आहे, हा भूमिपुत्रांवरचा जुलमी अत्याचार त्वरित थांबवावा. हा बळजबरीचा विकास त्यांच्या माथी मारू नका. तुमची विकासाची तळमळ ज्यांना अशा विकासाची आवड आहे त्या ठिकाणी दाखवा. या भूमिपुत्रांच्या स्वातंत्र्याची, सार्वभौमत्वाची, हक्काची, न्यायाची बूज राखा. त्यांच्या आत्मसन्माला, मानवीहक्कांना ठेच पोहचेल असे दुष्कृत्य करू नका. छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मभूमीचा दैदिप्यमान वारसा तसेच जी आय मानांकन असलेला अंजीर, सीताफळ, डाळिंब, वाटाणा इत्यादी दर्जेदार फळांची, माळव्याची निर्यात करणाऱ्या भूमीचा वारसा त्यांना जपू द्या. खरंतर या मातीच्या कर्तृत्वाचा दैदिप्यमान इतिहास अन् वारसा जपण्याचे कर्तव्य केवळ येतील भूमिपुत्रांचेच नाहीतर भारत देशातील सर्व विवेकवादी देशप्रेमींचे आहे, एवढा जाज्वल्य इतिहास असताना तुम्ही हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करून गद्दारीचा शिक्का तुमच्या भाळी लागण्याचे पाप घेऊ नका, तुमच्या येणाऱ्या शेकडो पिढ्यांना हा गद्दारीचा शिक्का नाईलाजाने मिरवावा लागल्यावर ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहतील काय?. 

                                  संतोबा (संतोष गांजुरे)...

Wednesday, April 2, 2025

गद्दार

सशाचे काळीज अन् सिंहाची माझी डरकाळी,
खबरदार, जर कोणी हसाल अन् वाजवाल टाळी.

आहे बेनामी जरी, तरी झोंबते आहे मज हे विडंबन.
लख्ख माझी बेईमानी, कसे करू मी तिचे खंडन.

दलाली अन् खंडणी मागणं, अजीर्ण झाले मज खाणं.
टिका करणं, दोष देणं, हे एवढेच आता माझे रडगाणं.

पोसल्या पिढ्या ज्याने, लाथाडले मी ते ताट.
अनाजीशी साठगाठ, ही समृद्धीची वाट सुसाट.

करकरीत चलनी कागदावरी जडली माझी प्रीती.
टीचभर नोटीशीच्या कागदाने, भरली मनी भीती.

गाफील ठेऊनी स्वकीयांना, असंगाशी संग केला.
वेळ बदलता, कावेबाजाने केसाने गळा कापला. 

बोगस कर्तुत्वाची, दिखाऊ पताका भिडवली आभाळी,
तरी दिसे बेदखल होण्याची, चिंता माझ्या कपाळी.

वाढीव माझे कर्तृत्व अन् वाढीव माझे कार्यकर्ते.
गद्दारीचा शिक्का भाळी, आता बाकी काय उरते.

मिळाली संधी नेतृत्वाची, ज्या भूमीचा वारसा शूरवीरांचा.
लाभली सारी पदं, पण उरलो केवळ म्होरक्या गद्दारांचा.                         

                                           संतोबा...

Sunday, March 2, 2025

विरोधाभास

स्वायत्ता नसलेली, विद्वत्ता काय कामाची.
अभिव्यक्ती दडपणारी, सत्ता काय कामाची
पंख छाटून कैदेतून, मुक्तता काय कामाची.
नवनिर्माण नसलेली, सृजनशीलता काय कामाची.
उचलेगिरीतून भासवलेली, अभिजातता काय कामाची.

कोणाचेच भले न करेल ती, नीतिमत्ता काय कामाची.
गरजवंताला याचक बनवणारी, दानशूरता काय कामाची.
काही चांगला बदल न घडवणारी, महानता काय कामाची.
पीडितास वणवण भटकवणारी, न्यायदेवता काय कामाची.
दुष्कृत्यासाठी माफी मिळेल ही, विश्वासार्हता काय कामाची. 

जगण्यासाठी वेठीस धरणारी, उद्योजकता काय कामाची.
दुसऱ्याच्या हक्काची लुबाडलेली, मालमत्ता काय कामाची.
व्यवस्थेत फेरफार करून आणलेली, सुबत्ता काय कामाची.
न्यूनगंडाची भावना निर्माण करणारी, भव्यता काय कामाची.
स्वछत्रछायेत दुसऱ्यांस खुंटवणारी, विशालता काय कामाची.

सुखाची आसक्ती ठेऊन, दिखाऊ विरक्तता काय कामाची.
दुसऱ्याला नामोहरम करण्याची, कल्पकता काय कामाची.
वंदून शिकवण पायदळी तुडवणारी, कृतज्ञता काय कामाची.
जबाबदारीतून पळवाट काढणारी, अलिप्तता काय कामाची.
संकट, संधीची चाहूल न लागणारी, दूरदृष्टिता काय कामाची. 

ठराविक बाजू घेणारी, निवडक निरपेक्षता काय कामाची.
अन्यायात निर्विकार राहणारी, निरागसता काय कामाची.
असुरक्षितता निर्माण करणारी, सहिष्णुता काय कामाची.
आदेशच पाळावी लागणारी, सार्वभौमत्वता काय कामाची.
भल्याबुऱ्याची जाणच नसणारी, बुद्धिमत्ता काय कामाची.

                                                   संतोबा...

Tuesday, January 14, 2025

संघटीत गुन्हेगारीचा फास

                सरकार कोणाचेही असले तरी गुन्हेगारी समूळ नष्ट होऊ शकत नाही. रागा-लोभातून घडणारे वैयक्तिक गुन्हे बऱ्याचदा उत्स्फूर्त(spontaneous) असतात. अशा गुन्हेगारीला शासन-प्रशासन कोणीच पूर्णपणे रोखू शकत नाही. गुन्हेगारांना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा देऊन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक ठेऊन अशा उत्स्फूर्त वैयक्तिक गुन्ह्यांवर सरकार काही अंशी नियंत्रण ठेवू शकते. अर्थात यासाठी सरकारचा कारभार समाजाभिमुख असायला हवा आणि सरकारची गुन्हे रोखण्याची इच्छाशक्ती असायला हवी. त्याचबरोबर सक्षम पोलिसयंत्रणा, स्वायत्त न्यायव्यवस्था असायला हवी म्हणजे गुन्हेगार कितीही मोठा असला, त्याचे कोणाशीही लागेबंध असले तरी प्रशासनाला तो डोईजड होणार नाही आणि त्यांना योग्य ती शिक्षा देता येईल. दुसऱ्या प्रकारची गुन्हेगारी संघटीत गुन्हेगारी आहे जी पूर्वनियोजित आणि समाजाला अत्यंत धोकादायक आहे.  Measure for Measure या शेक्सपियरच्या नाटकात एक वाक्य आहे  'काहींचा पापाने उत्कर्ष होतो, तर काहींचा पुण्याने ऱ्हास!' (Some rise by sin, and some by virtue fall). आजकाल पापाने उत्कर्ष होण्याचा काळ आहे. श्रीरामांनी म्हणले आहेच 'ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना तिनका कौआ मोती खाएगा'. 

                      नीतिमत्तेने आयुष्यभर कष्ट करणाऱ्याला त्याची कमाई दैनंदिन गरजा भागवण्यात खर्ची पडते, महिन्याचा खर्च भागत नाही अन् त्याचा हिशोब लागता लागत नाही त्यामुळे त्याच्याकडे अडीअडचणीला उपयोगी पडण्यासाठी काही ठेव शिल्लक उरत नाही. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला अनैतिक धंदे करणारे गैरमार्गाने खोऱ्याने पैसा ओढत असतात. बेहिशोबी उधळपट्टी करत असतात. ज्ञान तेथे मान अर्थात विद्वान सर्वत्र पूज्यते अशी उक्ती आहे पण सत्ता, संपत्ती ज्याचाकडे आहे त्यालाच मानमतराब, प्रतिष्ठा मिळतो भले ती संपत्ती, सत्ता वाममार्गाने मिळवलेली असो. आडमार्गाने अल्पकाळात कमावलेली संपत्ती त्यामुळे तिचा  झगमगाट अन छानछौकी ओघाने आलीच, सोशल  मीडियावर चिथावणीखोर व्हिडिओ व्हायरल करणे, दहशत निर्माण करण्यासाठी आणि तुरुंगातून सुटका झाल्यावर रॅली काढणे, वाढदिवसाचे परिसरात मोठमोठे फ्लेक्स लावणे, तलवारीने केक कापणे हा सगळा डामडौल पाहून नाही रे गटातील उपेक्षित तरुणांना, identity crisis असलेल्यांना त्याची भुरळ न पडली तरच नवल. गुन्हेगारीचा प्रभाव समाजातील तरुण वर्गावर पडतो आणि ते अशा टोळ्यांकडे आकर्षित होतात. गुन्हेगारांचे असे हे उदात्तीकरण समाजासाठी घातक आहे. नाही रे गटाच्या कोयता गँग, चड्डी गँग, अमुक ग्रुप, तमुक ग्रुप काही काळासाठी दहशत माजवतात, त्यांचा आवाका मर्यादित असतो अन् काही दिवसात अशा हंगामी गँग संपतात कारण त्यांच्यावर प्रशासकीय व्यवस्थेवर हुकूमत असलेल्या आकाचा वरदहस्त नसतो. वाटमारी, दरोडे, खंडणी, हत्या, लुबाडणूक एवढ्यापुरतीच संघटीत गुन्हेगारी मर्यादित नाही. 

                     समाजाला, पर्यावरणाला घातक असलेल्या गोष्टीवर कायदेशीर बंदी घातली जाते. अशा बंदी असलेल्या गोष्टींचा भाव मग कितीतरी पटीने वाढतो. अशाच बंदी घातलेल्या गोष्टीतून बेकायदेशीर गोष्टींचा काळाबाजार करून अमाप पैसा कमावला जातो. हा काळाबाजार रोखणे ज्यांच्या अधिकारात आहे त्यांच्याशी(प्रशासन) संगनमत आणि ज्यांना ते उत्तरदायी(जवाबदेही,answerable) असतात त्यांचा(शासन) वरदहस्त याच्या जोरावर असे अवैध, बेकायदेशीर धंदे फोफावतात. बऱ्याचदा राजकीय, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या वजनदार असलेल्या आणि समाजात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्यक्ती आपल्या एखाद्या विश्वासू व्यक्तीला हाताशी धरून असले घोटाळे करत असते जेणेकरून कधी घोटाळे उघड झालेच तर त्याचे बालंट आपल्यावर येऊ नये, करून सवरून आपण नामानिराळे रहावे व आपल्या प्रतिष्ठेस धक्का लागू नये. हळूहळू अशाप्रकारे एक समांतर परिसंस्था(ecosystem) निर्माण होते. ज्यांना हाताशी धरून असे घोटाळे केले जातात त्यांचा हव्यास वाढत जातो आणि ते शासन,प्रशासनाला इतके शिरजोर होतात की शासन, प्रशासन ही या परिसंस्थेच्या हातचे बाहुले बनून जाते. परस्पर हितसंबंध आणि साटंलोटं यामुळे गुन्हेगार अडकले तरी स्वतः चे हातच अडकले असल्यामुळे गुन्हेगारांना मुक्त करण्याच्या पळवाटा काढल्या जातात. कुंपणच शेत खायला लागल्यावर वचक तरी कोणाचा राहणार?.  

                    बरं एक दोन नव्हे तर शेकडो अवैध धंदे आहेत. अवैध सावकारी धंदा,अमली पदार्थ विक्री, रेशन धान्याचा काळाबाजार, अवैध लॉटरी-जुगार, अवैध वाळूउपसा, डोंगर-टेकड्या पोखरून अवैध उत्खनन करून मुरूम-खडीचा बेकायदेशीर धंदा, सार्वजनिक साधन संपत्तीचा अपहार, शाळा, बगीचे, मैदाने यांसाठी आरक्षित असलेल्या जागा हडपून अवैध बांधकामे, सार्वजनिक सरकारी, सहकारी, निमसरकारी उद्योगधंद्यातील दुय्यम उत्पादन(byproduct) जसे साखर कारखान्यातील मळी, औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील उत्सर्जित राख यांचे निविदा न काढता परस्पर विक्री अशी न संपणारी यादी आहे.  या अवैध, बेकायदेशीर धंद्यात निर्माण होणाऱ्या स्पर्धकांचा आणि निरपेक्षपणे अनैतिक, अवैध गोष्टींना विरोध करणाऱ्या पत्रकार,सामाजिक कार्यकर्ता, किंवा जो कोणी त्यांच्या धंद्याच्या आड येईल त्याचा बंदोबस्त निर्दयी, निर्घृणपणे हत्या करून केला जातो. त्यांना संपवण्यामागे केवळ वाटेतील काटा काढणे नसून आमच्या मार्गात आलात तर काय हाल होऊ शकतात याची दहशत बसावी हा उद्देश असतो. अमानुष, विकृत गुन्हे करून देखील गुन्हेगार सहीसलामत सुटतात, अगदीच प्रकरण अंगलट येऊ लागले तर एखाद्या प्यादाचा बळी देऊन प्रकरण शांत केले जाते. Justice delayed is justice denied अर्थात उशिरा मिळालेला न्यायही एकप्रकारचा अन्यायच असतो असे म्हणतात पण बऱ्याचदा उशिरा का होईना न्याय मिळण्याची शक्यता कमी असते. सर्वसामान्य जनता अशा प्रकारांकडे असहाय्य, हतबलपणे पहात असते.

                सर्वसामान्यांची ही हतबलता त्यांच्याच गाफीलपणाचा परिपाक आहे. येवढ्या- तेवढ्याने काय होते असे म्हणत छोट्या मोठ्या अनैतिक, बेकायदेशीर गोष्टींकडे कानाडोळा करून त्या खपवून घेतल्याने हळूहळू त्या गोष्टी  हाताबाहेर जातात. एकदा टोळीचा म्होरक्या गडगंज श्रीमंत झाला की मग तो समाजाचा मासिहा, तारणहार बनण्याचा प्रयत्न करतो. दानशूरपणाचा दिखावा करतो.  सामाजिक, धार्मिक उत्सवाचे आयोजन करतो, भरमसाट वर्गणी देतो, गरजूंना मदत करतो, लोकांना त्याचा आधार वाटू लागतो. खरंतर आपल्याला असल्या रॉबिनहूड टाईप संस्कृतीची गरज नाही. आपण असल्या गुन्हेगारांच्या उधळपट्टीचे लाभार्थी व्हायचं नाही आणि त्याची आपल्याला गरज नाही. आपल्याकडे लोकशाही आहे, ती सशक्त करणे आणि लोकशाही च्या माध्यमातून आपला उत्कर्ष करणे, आपले जीवन सुरक्षित करणे आपल्या हिताचे आहे. कोणतीही गोष्ट फुकट किंवा अनासाये भेटत नाही, अनैतिक व्यवहारातून आणि दुसऱ्याच्या हक्काचे लुबाडून त्यातला गुंजभर वाटा तुम्हाला देणारा हिंस्र गुन्हेगार त्या वाटणीचा मोबदला म्हणून तुम्हाला न मोजता येणारी किंमत कधी ना कधी वसूल करणारच. फुकट मिळणारी कोणतीही गोष्ट आवळा देऊन कोहळा काढण्याची क्लृप्ती असते हे कायम लक्षात ठेवायला हवे. वेळच्यावेळी शासन-प्रशासनाला बेकायदेशीर गोष्टी निदर्शनास आणून देऊन त्या बंद करण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. शासन, प्रशासन हे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आहे याचे भान शासन, प्रशासनाला असायला हवे आणि जनतेलाही त्याची जाण असायला हवी. आपण निरपेक्षपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. त्यांचा सन्मान केला पाहिजे म्हणजे बाकीचे अधिकारी ही निरपेक्षपणे, नैतिकतेने काम करण्यासाठी प्रेरित होतील. एक दिवस नक्की येईल ज्यावेळी समाज गुन्हेगारी कृत्य करणाऱ्याला आपल्या धर्माचा, जातीचा, भाषेचा, प्रांताचा म्हणून त्याला पाठीशी न घालता, त्याचा उदोउदो न करता त्याला विरोध करेन, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करेन. सत्य, न्याय, नितीमत्तेने काम करणाऱ्यांचा गौरव होईल, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. अर्थात यामध्ये आपल्या सर्वांचा आपआपल्यापरीने सातत्यपूर्ण सक्रिय सहभाग गरजेचा आहे.           


                                                               संतोबा..

Saturday, January 11, 2025

भांडवलशाहीचे ठेकेदार -२

                          आम्हाला रविवारी कामाला बोलवता येत नाही याची तुम्हाला खंत वाटते. रविवारच्या सुट्टीमुळे आम्ही कितीवेळ बायकोकडे आणि बायको आमच्याकडे एकटक बघत बसणार याची तुम्हाला चिंता वाटते. तुमची ही चिंता आणि खंत बघून आम्हाला रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे यांचा अजूनच जास्त अभिमान वाटतो, ज्यांनी तुमच्या सारख्या नाठाळांना वठणीवर आणणारी, आणि आमच्यासारख्या कष्टकरी, शोषित कर्मचाऱ्यांना आठवड्याभराच्या ढोर मेहनतीनंतर एक दिवस सुटका म्हणून रविवारी आठवड्याची हक्काची सुट्टी मिळवून दिली. या हक्काच्या साप्ताहिक सुट्टीमुळे तुम्हाला कितीही वाटले की आठवड्याचे सातही दिवस रोज १२-१५ तास अन् आठवड्याचे ९० तास राबवून घ्यावे तर ते तुम्हाला किंवा तुमच्या आकाला शक्य नाही. सर्वसामान्य जनतेला त्यांच्या नैसर्गिक, मानवी हक्काची जाण आणि त्या हक्काचे संविधानाच्या माध्यमातून संरक्षण, सर्वांना ज्ञानाची कवाडे खुली करून सक्तीचे शिक्षण, वंशश्रेष्ठत्वाचा बागुलबुवा करून मलईदार क्षेत्रात प्रस्थापित कंपुशाहीच्या अघोषित मक्तेदारीला शह देण्यासाठी आरक्षण देऊन फुले, शाहू, आंबेडकरांनी देशातील सर्वसामान्य जनतेला मानवी अधिकार बहाल केले त्यामुळे भांडवलदारांना आणि वंशश्रेष्ठत्वाचा वांझोटा टेंबा मिरवणाऱ्यांना या तिघांचा द्वेष वाटणे साहजिक आहे. आता तिघांबरोबर कामगारांना रविवारी साप्ताहिक सुट्टी, कामाच्या वेळा मर्यादित करण्यास भाग पाडणाऱ्या रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे यांचा पण द्वेष वाटू शकतो. 

                    तुम्हाला सर्वसामान्य जनतेला हतबल, लाचार करायचे आहे. कर्मचाऱ्यांनी आपला चरितार्थ चालवण्यासाठी पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून राहावे, त्यांनी समाजापासून, कुटुंबापासून फारकत घ्यावी. त्यांनी हूं की चू न करता तुमच्यासाठी गुलामांसारखे रात्रंदिन राबावे. त्यांनी कसल्याही मागण्या करू नयेत. कर्मचाऱ्यांना एवढे जखडून ठेवायचे, त्यांची सतत एवढी मानहानी करायची की त्यांना आपण एकदम टाकाऊ, निरूपयोगी आहोत, आपला इथे सोडून कुठेच निभाव लागणार नाही अशी भावना त्यांच्या मनात निर्माण करायची. त्यांना टार्गेट, डेडलाईन्स यामध्ये इतके गुरफटून ठेवायचे की त्यांनी दुसरा कोणातच विचार करता कामा नये. त्यांच्या डोक्यावर कायम नोकरी जाईल की काय याची टांगती तलवार लटकवत ठेवायची, ज्यामुळे कुटुंबापेक्षा कर्मचारी कामाला प्राथमिकता देईल. आपण कर्मचाऱ्यांसाठी खूप काही करतोय हे दाखवण्यासाठी त्यांच्यासाठी वर्षातून एखाद दुसरा कार्यक्रम ठेवायचा, आरोग्य तपासणी करायची, प्रेरणादायी व्यक्तीची भाषणे ठेवायची. फारसा आर्थिक लाभ न देता केवळ प्रमाणपत्रे, ट्रॉफी वाटून कर्मचाऱ्यांना अजून उत्साहाने काम करण्याची प्रेरणा देऊन शक्य होईल तेवढी वेठबिगारी करायला लावायची. 

                      तुमच्या असल्या विकृत विचारसरणीमुळे लोक तुम्हाला विरोध करू लागले, तुम्ही अडचणीत येऊ लागलात की तुम्हाला राष्ट्रनिर्मिती, राष्ट्रवाद आठवतो. आतापर्यंत गोष्टी अंगलट आल्या की देव, देश, धर्माची ढाल पुढे करण्यात राजकारण्यांचा हातखंडा होता. आता तुम्ही राष्ट्रवादाची ढाल पुढे करून आपला बचाव करू लागला आहात, केवळ बचाव नाही तर तुमची उत्पादने गुणवत्तेच्या तराजूत तोलण्याऐवजी ' देश की/ देश का अमुक तमुक' म्हणत उत्पादने देशभक्तीच्या तराजूत तोलत जाहिरात करत असता. राष्ट्रनिर्मितीच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका अन् राष्ट्रवाद शिकवण्याचा प्रयत्नही करू नका. ज्या व्यक्तीकडे कपाळाला लावायला चिमुटभर माती नाही, देशातील कुठल्याच जमिनीच्या तुकड्याच्या सातबाऱ्यावर त्याचे नाव नाही त्यांनाही या देशावर तुमच्याहून अधिक प्रेम आहे आणि तुमच्या इतकाच त्यांचाही या देशावर आणि या देशातील नैसर्गिक स्त्रोत, साधनसंपत्तीवर हक्क आहे. राष्ट्रउभारणीसाठी उद्योगधंदे गरजेचे आहे म्हणून सरकारने तुम्हाला कवडीमोल दराने जमिनी दिल्या, सुविधा, सवलती दिल्या, कर्जे दिली. त्यातून रोजगारनिर्मिती करून तुम्ही केवळ स्वतःची भरभराट केली, गरज संपली की कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावले. तुम्ही इथली सार्वजनिक नैसर्गिक साधन संपत्ती ओरबाडून घेतली. एनजीओ, पीआर एजन्सीच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमासंवर्धन करून आपण सर्वसामान्य लोकांचे तारणहार आहात याचा आभास निर्माण केला.

                 तुम्ही स्वतःला कितीही कर्मचाऱ्यांचे तारणहार समजलात तरी तुमचे अस्तित्वच सर्वसामान्य कर्मचाऱ्यांमुळे आहे याची जाण ठेवा. तुम्ही ज्या कंपनीच्या शिखरपदावर आहात त्या कंपनीचा पाया तुमच्या कंपनीतील कर्मचारीवर्ग आहे, सर्वसामान्य माणूस जो तुमचा ग्राहक आहे तो तुमच्या कंपनीचा आत्मा आहे. हा पाया ढासला, आत्मा तुमच्यापासून दुरावला तर तुमच्या उद्योगाचा ढोलारा ढासाळायला वेळ लागणार नाही. जगभरात धोरणी, प्रागतिक विचारांच्या, देशहिताचा विचार करणाऱ्या उद्योगपतींनी आपापल्या देशाच्या प्रगतीला हातभार लावला. भारतातही काही प्रमाणात उद्योगपतींनी देशाच्या प्रगतीला हातभार लावला पण सध्या उद्योगपती टॅक्सचोरी, कर्जबुडवेगिरी करून, प्रस्थापित सार्वजनिक संस्था हडपून पुरेपूर धंदेवाईक झाले आहेत. ते राष्ट्रउभारणीचे नव्हे तर राष्ट्र, समाज उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहेत. धंदेवाईक उद्योगपती देशाची, लोकांची भरभराट नव्हे तर  लुबाडणूक करत आहेत. लुबाडणूक करता करता अर्धा भारत अशा मुठभर लोकांच्या मुठीत गेला आहे. त्यांच्याकडे असलेला अमाप पैसा, सत्तेचा वरदहस्त यामुळे देशातील सर्व सार्वजनिक व्यवस्था ज्या सर्वसामन्य लोकांच्या हितासाठी, रक्षणासाठी उभारल्या आहेत त्या सार्वजनिक व्यवस्था अशा बड्याधेंड्याच्या बटीक झाल्या आहेत.  त्यांना आपण काहीही करू शकतो हा आत्मविश्वास आला आहे, त्यामुळे अधूनमधून अशी विकृत विधाने हे लोक करत असतात. खरंतर कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही, सर्वसामान्यांच्या सहनशीलतेचा अंत झाल्यास क्रांती घडण्यास वेळ लागणार नाही.

                 आपल्याला स्वातंत्र्य मिळून फार काळ लोटलेला नाही, आपल्या पूर्वजांनी मोठ्या संघर्षाने आणि बलिदान देऊन स्वातंत्र्य आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवला आहे. आपल्याला आपले स्वातंत्र्य, आपले हक्क टिकवायचे असतील तर गाफील राहून चालणार नाही. आपल्या स्वातंत्र्यावर, नैसर्गिक मानवी हक्कावर गदा आणू पाहणाऱ्या विकृती आपण वेळच्या वेळी ठेचल्या पाहिजेत त्यासाठी आपल्याला संघटित होणे गरजेचे आहे. उद्योगपतींनी आणि नेत्यांनी त्यांना अडचणीच्या ठरणाऱ्या कामगार संघटना मोठ्या शिताफीने संपवल्या. आता पुन्हा कामगार संघटना पुनर्जीवित करण्याची वेळ आलेली आहे. असंघटित क्षेत्रात कामगारांची खूप पिळवणूक केली जाते. संघटित होऊन संघर्ष करून आपल्याला आपला उत्कर्ष करायचा आहे आपले स्वातंत्र्य टिकवायचे आहे. हा देश आपला आहे, या देशातील सर्व सार्वजनिक साधनसंपत्तीवर आपला हक्क आहे, ती कोणा एकाच्या मालकीची नाही. आपल्याला ही साधनसंपत्ती  आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी जतन करून ठेवायची आहे. आपल्याला स्वातंत्र्य, न्याय, समताधारीत, सर्वांना समान संधी देणारा भारत घडवायचा आहे. त्यासाठी वेळप्रसंगी सर्वस्वपणाला लावण्याची तयारी ठेवायला हवी. अंतिम विजय हा सत्याचा, न्यायाचा आणि सर्वसामान्य जनतेचाच होईल.

                                                      संतोबा...


 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!