चांगभलं होता होता, स्वप्ने सारी उद्ध्वस्त झाली.
अरे पुन्हा सत्तेतून हटवा, दलालांचे वाली.
अरे पुन्हा सत्तेतून हटवा, दलालांचे वाली.
आम्ही पोकळ आश्वासनांची ही, पालखी का वहावी.
जे कधी मिळणार नव्हते, त्याची आस का बाळगावी.
कशी जेलात जाणाऱ्यांची, मंत्रीमंडळी वर्णी लागली.
तोऱ्यात केली त्यांनी, कायदा सुव्यवस्थेची माती.
आम्हांवरी कारवाईची, तलवार कायम लटकती.
आम्ही ते विवेकी, ज्यांना शोषित ही ना वाली.
उभा पक्ष झाला आता भ्रष्ट, गुंडांची बंदिशाला.
जिथे कलंकितांना, मंत्रिपदाचा प्रसाद मिळाला.
कसे हे निष्ठावंत दुर्देवी अन गद्दार भाग्यशाली.
धुमसतात अजुनी मेल्या, वर्णश्रेष्ठत्वाचे निखारे.
अजूनही द्वेष पेरत फिरती, कट्टरतावादी सारे.
आश्वासनेच जन सुरक्षतेची, आम्हाला मिळाली !
तेच जुने डाव पुन्हा टाकती, फिरुनी नवे सत्ताधारी.
तेच गळफास लावती, सिंहासनावरचे नाग विषारी.
आम्ही मात्र पोसत राहतो, त्याच त्या विषवल्ली.
अशी कशी ज्याने त्याने ठेवली, बुद्धी गहाण?
असे कसे हे जहागिरदार, सत्तेस गेले शरण?
कशी लाचार शहेनशहांनी, पत्करली ही दलाली?.
संतोबा ...
0 प्रतिक्रिया:
Post a Comment