चांगभलं होता होता, स्वप्ने सारी उद्ध्वस्त झाली.
अरे पुन्हा सत्तेतून हटवा, दलालांचे वाली.
अरे पुन्हा सत्तेतून हटवा, दलालांचे वाली.
आम्ही दिल्या पोकळ आश्वासनांची, पालखी का वहावी.
जे कधी सिद्धीस जाणार नव्हते, त्याची आस का बाळगावी.
कशी जेलात जाणाऱ्यांची, मंत्रीमंडळात वर्णी लागली.
तेच जुने डाव पुन्हा टाकती, फिरुनी नवे सत्ताधारी.
तेच गळफास लावती, सिंहासनावरचे नाग विषारी.
आम्ही मात्र पोसत राहतो, त्याच त्या विषवल्ली.
अन्यायाच्या चिखलात, कशी द्वेषाची बाग फुलवती.
आम्हांवरी कारवाईची, तलवार सदा लटकती.
आम्ही ते विवेकी, ज्यांना शोषित ही ना वाली.
अशी कशी ज्याने त्याने ठेवली बुद्धी गहाण?
असा कसा जो तो जहागिरदार सत्तेस शरण?
ह्या लाचार शहेनशहांनी का पत्करली दलाली?.
उभा पक्ष झाला आता, भ्रष्टांची बंदिशाला
जिथे कलंकितांना, मंत्रिपदाचा प्रसाद मिळाला.
कसे निष्ठावंत दुर्देवी अन गद्दार भाग्यशाली.
मोकाट फिरतात अजुनी, हल्लेखोर दहशतवादी.
अजून उसवती समतेची वीण, सारे कट्टरतावादी.
आश्वासनेच जन सुरक्षतेची आम्हाला मिळाली !
संतोबा ...
0 प्रतिक्रिया:
Post a Comment