Ads 468x60px

Saturday, June 8, 2019

अमोल कोल्हे - लोकसभा निवडणुक २०१९

                 साधारण सात वर्षांपूर्वी दादरला 'साहेब' चित्रपटाच्या प्रीमियरच्या निमित्ताने प्लाझाला अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (DrAmol Kolhe) यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली होती. अभिनेते संजय मोहिते(Sanjay Mohite) व मी शो टायमिंगच्या तास-दीड तास आधीच पोहचलो होतो, पुढच्या दहा-पंधरा मिनिटांत अमोल कोल्हे देखील पोहचले. जवळपास तासभर आम्हां तिघांना चर्चा करण्यासाठी वेळ मिळाला, अर्थात बहुतांश वेळ मी फक्त श्रोता म्हणूनच भूमिका पाडली. राजा शिवछत्रपती मालिकेत कोल्हेनीं छत्रपती शिवाजी महाराज तर संजूने बहिर्जी नाईकांची(दीड डझन वेगवेगळ्या रूपातील) अजरामर भूमिका पार पाडल्या होत्या. त्याचबरोबर ऑन ड्युटी चोवीस तास, राजमाता जिजाऊ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यातूनच त्यांची गट्ट मैत्री जुळली. अनेकदा सोबत अभिनय केल्याने दोघांकडे अनेक आठवणीचे भांडार होते. त्यामुळे चित्रीकरणावेळच्या आठवणी, चालू,आगामी प्रोजेक्ट्स इ. बद्दल सविस्तर चर्चा झाली.
                जवळपास चार वर्षे संजू सोबत रहात असल्याने, त्याची नाटक, सिनेमाबद्दलची आपुलकी आणि जीवतोड मेहनत पहात होतो. नाटक, सिनेमा हे त्याचे केवळ उदरभरणाचे साधन नव्हते तर ती त्याचा आत्मा तीच त्याची ओळख होती. प्रत्येक गोष्ट मनापासून करायची , आपले शंभर टक्के योगदान द्यायचे एवढंच त्याला माहित. कधी यश,प्रसिद्धी मिळाली म्हणून गर्व, अहंकाराची बाधा झाली नाही. परिस्थिती कशीही असो त्याची कायमच मातीशी,समाजाशी नाळ जुळलेली राहिली आहे आणि म्हणून आयुष्यात स्टेजवर दोन शब्दही न बोलू शकलेला मी त्याला फुकटचे सल्ले देऊ शकत होतो.
त्या चर्चेत अशाच मेहनती, मातीशी,समाजाशी नाळ जुळलेल्या, प्रत्येक गोष्टीत आपले शंभर टक्के योगदान देणाऱ्या अमोल कोल्हेचीं ओळख झाली. एकाचवेळी अनेक भूमिका करत असतानाच एका गोंडस परीचा पिता म्हणून कराव्या लागणाऱ्या कसरतीबद्दल ते सांगत होते. त्यांना अभिनयाबरोबर जिमची आवड असल्याने फक्त दुपारी वेळ मिळत असल्याने त्यांनी दुपारी १२ ते २ जिम केली पण त्यात खंड पडू दिला नव्हता.माणूस ध्येयवेडा असल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही.अमोल कोल्हे ध्येयवेडे आहेत म्हणून शैक्षणिक कारकिर्दीत गुणवत्ता यादीत झळकले, डॉक्टर झाले, यशस्वी अभिनेता झाले. .२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अमोल कोल्हेनां उमेदवारी मिळाली आणि मला या सर्व आठवणींची उजळणी झाली. आता नेते म्हणूनही निश्चितच ते यशस्वी होतील यात शंका नाही.
                 राजकारणात अमोल कोल्हे जरी आधीपासून असले तरी आणि त्यांनी पक्ष सोडल्याच्या आणि लगोलग लोकसभेची उमेदवारी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर टीका करण्यात येऊ लागली. नेत्यांपेक्षा समर्थक सोशल मीडियावर हीन पातळीवर जाऊन टीका करू लागलेत. कालपर्यंत वंदनीय असलेले आज अचानक गद्दार ठरवले गेले. आडनाव, व्यवसाय इत्यादींवरून टीका करण्यात आली. याचा दुसरा अर्थ असा की ते जर खरचं एवढे चांगले नसते तर त्यांना अनुल्लेखाने सुद्धा मारता आले असते पण घाव वर्मी बसला होता. एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर टीका करता येईना म्हणून आडनाव, व्यवसाय जातीचा आधार घ्यावा लागत आहे. कोल्हेनीं अभिनेता म्हणून अजरामर भूमिका साकारल्या. नेता, राजकारणी म्हणूनही ते शंभर टक्के आपले योगदान देतील आणि ते देता यावे म्हणून ते अभिनयातून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ते खात्रीपूर्वक पुरोगामी महाराष्ट्राला साजेल असे राजकारण करतील आणि दुर्दैवाने कधी वैचारिक तडजोड करण्याची वेळ आलीच तर राजकारण सोडण्यासाठी क्षणभराचा देखील विलंब लावणार नाहीत.
             अमोल कोल्हेनां समर्थन ते सुशिक्षित, सुसंस्कारी, सर्वसमावेशक आहेत म्हणून तर आहेच पण पक्ष सोडला म्हणून त्यांच्यावर अर्वाच्च भाषेत टीका करण्यात येत आहे म्हणून जास्त आहे. अनेकांना घराणेशाही,अशिक्षित, गुंड, भ्रष्टाचारी नेते, ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका वाटतेय त्यांना फार मोठी संधी आहे अमोल कोल्हेनसारख्या उच्चशिक्षित, गुणवत्ता यादीत झळकलेल्या हुशार, सर्वसामान्य कुटुंबातील, सामाजिक भान असलेल्या एका निर्मळ मनाच्या अभिनेत्याला नेता बनवण्याची. अमोल कोल्हेनां मत देऊ नये असे एकही कारण नाहीये. निवडणुका हा भारतीय लोकशाहीचा सर्वात पवित्र सण आहे त्यात द्वेषाचे, फुक्या अस्मितेचे राजकारण करणाऱ्यांना नाकारून, सामाजिक भान असलेल्या, सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्यांना निवडून देऊया.
                                                                                         
                                                                                          संतोबा...

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!