Ads 468x60px

Monday, May 4, 2015

बळी राजाचा बळी- ३) आत्याबाईंच्या मिशा

 एप्रिल महिना असूनही या महिन्यात तीन चार वेळा पाऊस पडला, अगदी गारांचाही, आम्ही पुरंदरमध्ये आहोत की उत्तरेकडील एखद्या ठिकाणी असा भास व्हावा इतका. ऋतूचक्र पूर्णत बदलत चालले आहे पण निसर्गाला तरी किती दोष द्यावा आम्ही तो शिल्लकच ठेवला नाही. हा सर्व दोष मानवाच्या मूर्ख आणि स्वार्थी प्रवृत्तीचा. पैसा आला, जीवनमान सुधारले, दूरवरुन विहिरीतून शेंदून पाणी आणायला लागायचे आता घरोघरी बोअरवेल आले, गॅससिलेंडर आल्यामुळे गोवर्‍या, सरपण हद्दपार झाले. बैलजोड्या गेल्या ट्रॅक्टर आले. सर्व काही असूनही हाव मात्र वाढतच चालली आहे. पुर्वी शेताला मोठे बांध असायचे त्यावर चिंचा-बोरे-जांभुळ,कडुलिंब इत्यादी अनेक प्रकारची झाडे असत, ही झाडे शेतात ओल धरून ठेवत. त्या बांधावार गाई-गुरे चरायची. आता ना बांध शिल्लक राहीले ना झाडे, ना रानात चरणारी गुरे राहिली.
मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, पण एखादा चुकून विझला तर वंश बुडायला नको म्हणून दोघा-तिघांचा जन्म होऊ लागला त्या दरम्याने दोन-तीन मुलींचा नंबरही लागायचा म्हणजेच चार-पाच जणांची एक पिढी तयार व्हायची अर्थात त्यामुळे जमिनीच्या वाटण्या होऊन लहान-लहान तुकडे पडत गेले, पण आता "हम दो हमारे दो" चा काळ असल्यामुळे घरोघरी साधारण एकच वंशाचा दिवा असतो, पण म्हणून काही जमिनीचे तुकडे पडणे थांबले नाही. हा काळ स्री-पुरूष समानतेचाही आहे. ही समानता अस्तित्वात येण्यासाठी सर्वशक्तीमान न्यायदेवतेने आणि मायबाप सरकारने स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने न्याय,हक्क मिळावे म्हणून काही कायदे केले आहेत. विवाहकायदा व पोटगी कायदा (घटस्फोट झाल्यास पोटगीची, पतीच्या स्थावर मालमत्तेतील वाटा), कौटुंबिक हिंसाचार कायदा, आरक्षण, समान वेतन कायदा , वारसाहक्क कायदा आणि त्यात वाढच होत चालली आहे, आधी ३३ टक्के आरक्षण मग ५० टक्के आरक्षण, आधी वाडिलोपार्जित संपत्तीत काही ठराविक हिस्सा आता समान हिस्सा, त्यामुळे  "आत्याबाईंना मिशा असत्या तर काका म्हटले असते" या म्हणीप्रमाणे आता आत्याबाईंना काका म्हणण्यासाठी मिशा असण्याची गरज नाही. कारण कायद्याने त्यांना काकाचा दर्जा आणि हक्क दिले आहेत.
जमिनीची किंमत जशी जशी वाढली तसतशी तिची इज्जत कमी होऊ लागली, जमिनीला काळी आई मानून तिची सेवा करणारा माणूस शुल्लक शौकांसाठी काळ्या आईला धनदांडग्याना विकू लागला. त्यांनी शेती कसण्यासाठी नाही तर गुंतवणूक म्हणून विकत घेऊन तिला काटेरी कुंपनात बंदिस्त केले. प्राणी-पशु-पक्षी,मानव यांना भरभरून अन्नधान्य देणारी काळी आई वांझ बनली. पैशापायी नाती संपली, नितिमत्ता, तत्वे कालबाह्य झाली. बहिणी आता हिस्सा मागू लागल्या. साधारणपणे पंचवीस-तीस किलोमीटर वर माहेर असलेल्या मुली जमिनी मिळाल्याबरोबर विकणारच सरंजामशाह निर्माण होऊ लागले.

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!