विमानतळ
काळ बनलंय विमानतळ,
पण टळून जाईल ही वेळ.
तुटू न देऊ या मातीशी नाळ,
धीर धरू, सोसू थोडीशी कळ.
एकी राखू, येईल पंखात बळ,
जगप्रसिद्ध अंजीर अन् सीताफळ.
जागतिक वारसा हा, नको त्यास झळ,
हा ठेवा वाचवण्यासाठी ही सारी तळमळ.
त्यासोबत असे ताज्या माळव्यांची हिरवळ,
कष्टाचे मिळे समाधान आणि उत्पन्न बक्कळ.
आश्वासनांचा अन् मोबदल्याचा नका घालू मेळ,
अडल्यानडल्यास फितवण्याचा नका हो करू खेळ.
विरोध असे आमचा ठाम, नको संमतीची खळखळ,
आम्ही ओळखून आहोत सारी दलाल दुतोंडी गांडुळं.
कटकारस्थाने करू उघड अन् थांबवू त्यांची वळवळ.
हर हर महादेवाचा जयघोष ओठी आहे सदासर्वकाळ.
अन् खंडोबाच्या भंडाऱ्याने रंगले आहे आमुचे कपाळ.
लढजिंकण्याच्या निर्धाराने उत्साह आमुचा सळसळं.
शिवछत्रपतींच्या केवळ नावानेच रक्त आमुचे उसळं.
हा आमुचा लढाच आणेन बळीराजाचा सुवर्णकाळ.
दुधदुभत्या, खात्या घरात आनंदाने नांदेल गोकुळ.
दलालांनो तुम्ही आता नका येऊ आमच्या जवळ.
जगा अन् जगू द्या, एवढीच मागणी साधीसरळ.
तुम्ही आम्ही एकच, नको कसलीही जळजळ.
तुम्हाला सुधारण्याचे मार्ग आहेत पुष्कळ.
ऐका एवढा सल्ला, नका करू खळबळ.
नाहीतर कराल आयुष्यभर पळापळ.
संतोबा (संतोष गांजुरे)
0 प्रतिक्रिया:
Post a Comment