आम्ही कोणाच्या समर्थनात नाही, ना कोणाच्या विरोधात आणि तठस्थ तर त्याहूनही नाही. आम्हाला आमच्याच घरात कोणाच्या मेहेरबानीवर आणि अटी शर्तीवर जगणं मान्य नाही. आम्हाला आमच्याच घरात दिली जाणारी दुय्यमपणाची वागणूक मान्य नाही. ज्या महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडवला आहे त्या आमच्या महापुरुषांची अवहेलना आम्ही सहन करणार नाही. आमच्या पूर्वजांनी कष्टाने उभारलेल्या महाराष्ट्रात आश्रयाला आलेल्या उपऱ्यांचे आमच्या संस्कृतीवर केलेलं आक्रमण आणि त्यांनी आमच्या परंपराची केलेली अवहेलना सहन केली जाणार नाही. सर्वांना सामावून घ्यायचा पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा आहे, हा वारसा आम्ही अभिमानाने पुढे चालवत आहोत पण या उद्दात भावनेचा गैरफायदा घेऊन ज्या उपऱ्यांनी इथल्या चवलीपावलीसाठी आत्मा विकलेल्या गद्दारांना सोबत घेऊन कटकारस्थाने करून, छक्केपंजे करून इथल्या भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करून आपापली साम्राज्ये स्थापन केलेली आहेत ती जमीनदोस्त करणे आणि भूमिपुत्रांना न्याय देणे आमचे आद्यकर्तव्य आहे.
आणि म्हणूनच ....
‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’
संतोबा..